शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

राजवाडा झाला स्वातंत्र्य दिनापासून पोरका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:39 IST

अंजर अथणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राजवाड्यातील सत्तर वर्षांच्या पाऊलखुणा जपणारी माती, ऐतिहासिक क्षणांना कवेत घेऊन उभारलेल्या इमारती आता स्वातंत्र्य दिन व अन्य शासकीय कार्यक्रमांपासून पोरक्या होणार आहेत. अनेक वर्षांची खंडित होणारी परंपरा...आणि कार्यालयांच्या स्थलांतरातून आलेले भकासपण जपत या इमारतींना उभे रहावे लागणार आहे. ध्वजारोहणाची सत्तर वर्षांची परंपरा यंदा खंडित ...

अंजर अथणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राजवाड्यातील सत्तर वर्षांच्या पाऊलखुणा जपणारी माती, ऐतिहासिक क्षणांना कवेत घेऊन उभारलेल्या इमारती आता स्वातंत्र्य दिन व अन्य शासकीय कार्यक्रमांपासून पोरक्या होणार आहेत. अनेक वर्षांची खंडित होणारी परंपरा...आणि कार्यालयांच्या स्थलांतरातून आलेले भकासपण जपत या इमारतींना उभे रहावे लागणार आहे. ध्वजारोहणाची सत्तर वर्षांची परंपरा यंदा खंडित होऊन विजयनगरच्या नव्या मातीत रुजू होऊ पाहत आहे.क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळख असलेल्या सांगलीत नेहमीच स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जातो. पहिला स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा राजवाडा चौकातील दरबार हॉलसमोर झाला होता. यानंतर सलग ६९ वर्षे हा सोहळा याच ठिकाणी साजरा करण्यात आला. आता ही परंपरा पहिल्यांदाच खंडित होत असून, ७० वा वर्धापन दिनाचा सोहळा आता विजयनगर येथील नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात येणार आहे. जुन्या चांगल्या परंपरा नव्या ठिकाणीही कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी दिली आहे.स्वातंत्र्याचा पहिला सोहळा सांगलीतील राजवाडा चौकातील दरबार हॉलसमोर झाला होता. याठिकाणी चिंतामणराव पटवर्धन (दुसरे) यांनी पहिल्यांदा याठिकाणी तिरंगा फडकवला होता. यावेळी स्वातंत्र्यसेनानी वसंतदादा पाटील, बापूसाहेब अण्णासाहेब पाटील, डॉ. देशपांडे, जयराम कुष्टे यांच्यासह अनेक सेनानी उपस्थित होते. यावेळी पोलिसांची परेडही झाली होती. स्वातंत्र्यानंतर संस्थाने विलीन करण्यात येणार आहेत, हे माहीत असूनही सांगली संस्थानात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संस्थानचे सर्व अधिकारी व सरंजामदार उपस्थित होते. तत्पूर्वी टिळक चौकातून शालेय विद्यार्थी, नागरिक व स्वातंत्र्य सैनिकांची भव्य रॅली काढण्यात आली होती.यानंतर सलग ६९ वर्षे याठिकाणी १५ आॅगस्टला मुख्य शासकीय सोहळा साजरा करण्यात येत होता. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने रोज गणेशदुर्गवर ध्वजारोहण करण्यात येत होते.आता जिल्हाधिकारी कार्यालय विजयनगर येथे नव्या इमारतीत स्थलांतरित झाल्याने प्रथमच १५ आॅगस्ट त्याठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे राजवाडा आता स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यापासून पोरका होणार आहे. जुन्या इमारतीत आता केवळ ऐतिहासिक पाऊलखुणा उरणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांना ध्वजवंदनासाठी राजवाडा चौकात येणे सोयीचे होते. त्यांनाही आता विजयनगरला जावे लागणार आहे.साक्षीदार व्हा : काळम-पाटीलयाबाबत जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील म्हणाले की, काळाच्या ओघात अनेक बदल होत असतात; मात्र आम्ही नव्या ठिकाणीही जुन्या ज्या चांगल्या परंपरा आहेत, त्या कायम ठेवणार आहे. पाचशे ते सातशे नागरिक नव्या ठिकाणी ध्वजारोहणाचा सोहळा सहज पाहू शकतील, यासाठी नियोजन करणार आहे. यासाठी आम्ही जिल्हा पोलिसप्रमुख व अधिकाºयांची बैठक घेत आहे. मोठा शामियाना उभारणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन प्रशस्त इमारत उभारली असून, यामुळे चांगले प्रशासन देणे सोयीचे होत आहे. स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात आणि चांगल्याप्रकारे करता येईल, यासाठीही आमचे नियोजन सुरू आहे. नवा पायंडा पाडताना कोणतीही कसर राहणार नाही, याची दक्षता घेत आहोत. नागरिकांनीही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे माझे आवाहन आहे. नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात १५ आॅगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता सहकार व पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.