शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

नकट्या विहिरीचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2016 00:35 IST

मिरजेतील ऐतिहासिक विहीर : नष्ट होण्याच्या मार्गावर; पुनरुज्जीवनाची मागणी

मिरज : मिरजेतून लातूरला पाणी पुरवठ्यासाठी रेल्वे स्थानकातील हैदरखान विहिरीने महत्त्वाची भूमिका बजावली असताना, मीरासाहेब दर्ग्यातील ऐतिहासिक नकट्या विहिरीचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शहरातील ऐतिहासिक व मोठ्या विहिरींची दुरवस्था दूर करण्याची मागणी होत आहे. मीरासाहेब दर्ग्यातील आदिलशाहीच्या काळात पंधराव्या शतकात दर्ग्यात पाणी वापरासाठी खोदण्यात आलेली विहीर ‘नकट्याची विहीर’ या नावाने ओळखली जाते. या पाचशे वर्षे जुन्या ऐतिहासिक विहिरीत गेल्या २० वर्षांपासून कचरा टाकण्यात येत आहे. दर्गा आवारातील या विहिरीचा आकार मोठा असून, शंभर फूट खोल विहिरीत कमानींचे दगडी बांधकाम आहे. १९९६ पर्यंत विहिरीतील पाण्याचा वापर सुरू होता, मात्र त्यानंतर पाण्याचा वापर नसल्याने विहिरीत कचरा टाकला जात आहे. कचरा टाकण्यासाठी वापर करण्यात येत असल्याने या ऐतिहासिक विहिरीचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. विहिरीतील कमानींची पडझड झाली आहे. या विहिरीतील पाण्याचे मोठे झरे कचरा व मातीमुळे बंद झाले आहेत. काही वर्षांपूर्वी या विहिरीतील गाळ काढण्याचा प्रयत्न केला होता; मात्र पाण्याचे मोठे झरे लागल्याने गाळ काढणे शक्य झाले नाही. (वार्ताहर)मोठ्या प्रमाणावर पाणीसाठ्याची क्षमताया मोठ्या विहिरीचे पुनरुज्जीवन केल्यास मोठ्याप्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. यावर्षीचा दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर विहिरी, बंधारे व पाणीसाठ्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. लातूरला पाणी पुरवठ्यासाठी रेल्वेच्या हैदरखान विहिरीची साफसफाई व स्वच्छता करून त्यात पाणीसाठा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मीरासाहेब दर्गा आवारातील ऐतिहासिक नकट्या विहिरीतील गाळ काढून विहिरीच्या पुनरुज्जीवनाची मागणी होत आहे. मिरजेतील मीरासाहेब दर्ग्यातील ऐतिहासिक नकट्या विहिरीची दुर्लक्षामुळे पडझड झाली आहे. या विहिरीत आता परिसरातील कचराही टाकला जात आहे.