शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

नकट्या विहिरीचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2016 00:35 IST

मिरजेतील ऐतिहासिक विहीर : नष्ट होण्याच्या मार्गावर; पुनरुज्जीवनाची मागणी

मिरज : मिरजेतून लातूरला पाणी पुरवठ्यासाठी रेल्वे स्थानकातील हैदरखान विहिरीने महत्त्वाची भूमिका बजावली असताना, मीरासाहेब दर्ग्यातील ऐतिहासिक नकट्या विहिरीचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शहरातील ऐतिहासिक व मोठ्या विहिरींची दुरवस्था दूर करण्याची मागणी होत आहे. मीरासाहेब दर्ग्यातील आदिलशाहीच्या काळात पंधराव्या शतकात दर्ग्यात पाणी वापरासाठी खोदण्यात आलेली विहीर ‘नकट्याची विहीर’ या नावाने ओळखली जाते. या पाचशे वर्षे जुन्या ऐतिहासिक विहिरीत गेल्या २० वर्षांपासून कचरा टाकण्यात येत आहे. दर्गा आवारातील या विहिरीचा आकार मोठा असून, शंभर फूट खोल विहिरीत कमानींचे दगडी बांधकाम आहे. १९९६ पर्यंत विहिरीतील पाण्याचा वापर सुरू होता, मात्र त्यानंतर पाण्याचा वापर नसल्याने विहिरीत कचरा टाकला जात आहे. कचरा टाकण्यासाठी वापर करण्यात येत असल्याने या ऐतिहासिक विहिरीचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. विहिरीतील कमानींची पडझड झाली आहे. या विहिरीतील पाण्याचे मोठे झरे कचरा व मातीमुळे बंद झाले आहेत. काही वर्षांपूर्वी या विहिरीतील गाळ काढण्याचा प्रयत्न केला होता; मात्र पाण्याचे मोठे झरे लागल्याने गाळ काढणे शक्य झाले नाही. (वार्ताहर)मोठ्या प्रमाणावर पाणीसाठ्याची क्षमताया मोठ्या विहिरीचे पुनरुज्जीवन केल्यास मोठ्याप्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. यावर्षीचा दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर विहिरी, बंधारे व पाणीसाठ्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. लातूरला पाणी पुरवठ्यासाठी रेल्वेच्या हैदरखान विहिरीची साफसफाई व स्वच्छता करून त्यात पाणीसाठा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मीरासाहेब दर्गा आवारातील ऐतिहासिक नकट्या विहिरीतील गाळ काढून विहिरीच्या पुनरुज्जीवनाची मागणी होत आहे. मिरजेतील मीरासाहेब दर्ग्यातील ऐतिहासिक नकट्या विहिरीची दुर्लक्षामुळे पडझड झाली आहे. या विहिरीत आता परिसरातील कचराही टाकला जात आहे.