शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

अंगणवाडीतील बालचमूंचा खाऊ धोक्यात

By admin | Updated: November 30, 2015 01:12 IST

मिरज तालुक्यातील परिस्थिती : शासनाकडून बचत गटाची बिले थकित

नरवाड : मिरज तालुक्यातील महिला बचत गटांचे अंगणवाडीला खाऊ पुरविण्याचे पैसे शासनाने अद्यापही दिले नसल्याने बालचमूंचा खाऊ धोक्यात आला आहे. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी युतीच्या काळात अंगणवाडीच्या मुलांना खाऊ शिजवून देण्यासाठी अन्नपदार्थांचे साहित्य शासनाकडून पुरविले जात होते. याकामी मदतनीसांना अधिक परिश्रम घ्यावे लागत होते. हा खाऊ अंगणवाडीतच शिजविला जायचा. अंगणवाडीत खाऊ शिजविताना काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्या. याचा लेखाजोखा घेऊन तत्कालीन सरकारने अंगणवाडीच्या मुलांना खाऊ शिजवून देण्यासाठी महिला बचत गटांना अनुमती दिली. तेव्हापासून महिला बालकल्याण विभागाच्या देखरेखीखाली अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार किती, कोणता, कधी, द्यावा याची रुपरेषा ठरवून देण्यात आली. त्यानुसार महिला बचत गट स्वत: खासगी दुकानातून माल खरेदी करून अंगणवाडीतील मुलांना खाऊ स्वतंत्रपणे शिजवून देत आहेत. मात्र एप्रिल २०१५ पासून महिला बचत गटांची बिले पूर्णपणे थकित आहेत. बिले थकित असूनही गेल्या ७ महिन्यांपासून महिला बचत गटांनी पदरमोड करून अंगणवाडीतील बालचमूंना खाऊ देण्याचे काम अखंडित सुरू ठेवले आहे, याची जाणीव शासनाला असूनही अद्याप महिला बचत गटांना खाऊची बिले दिलेली नाहीत.परिणामी सर्व महिला बचत गट पदरमोड करून घाईला आले असून, कोणत्याहीक्षणी बालचमूंचा खाऊ बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बचत गटातील महिलांनी प्रसंगी व्याजाने पैसै काढून आणि अंगावरील सोने गहाण टाकून सद्यस्थितीत बचत गट चालविले आहेत. याबाबत म्हैसाळ (ता. मिरज) येथील धनश्री महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुवर्णा डिग्रजे यांनी सांगितले की, शासनाने आता आमचा अंत पाहू नये. त्वरित खाऊची बिले मिळाली नाहीत, तर नाईलाजास्तव अंगणवाड्यांना खाऊ बंद करावा लागेल. खाऊची बिले त्वरित देण्याची मागणी सर्वच महिला बचत गटांकडून होत आहे. (वार्ताहर)बचत गट अडचणीतअंगणवाडी बालकांना बचत गटामार्फत पोषण आहाराचे वाटप केले जात आहे. या बचत गटांकडून पदरमोड करून सात महिन्यांपासून पोषण आहार पुरवठा सुरू आहे. यामुळे हे बचत गट सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याकडे शासनाने लक्ष द्यावे.