शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

खानापूर तालुक्यामध्ये दुष्काळाचे उग्र रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:47 IST

दिलीप मोहिते । लोकमत न्यूज नेटवर्क विटा : सांगली जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या खानापूर तालुक्यातील बाणूरगड, कुसबावडे, ताडाचीवाडी परिसरात ...

दिलीप मोहिते ।लोकमत न्यूज नेटवर्कविटा : सांगली जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या खानापूर तालुक्यातील बाणूरगड, कुसबावडे, ताडाचीवाडी परिसरात दुष्काळाने उग्र रूप धारण केले आहे. या गावांमधील विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या असून दुष्काळी उपाययोजनेचा भाग म्हणून केवळ टॅँकरच्या दीड खेपा दिल्या जात आहेत. त्यामुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांमधून प्रशासन व राज्यकर्त्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.खानापूर तालुक्याच्या पूर्व भागातील घाटमाथ्यावरील बाणूरगड हे सांगली जिल्ह्यातील शेवटचे गाव. अठरा विश्व दारिद्र्याचा सामना करावा लागत असलेल्या या गावातील लोकांवर गेल्या तीन वर्षांपासून वरूणराजाही कोपला आहे. सुमारे सोळाशे ते सतराशे लोकसंख्या असलेल्या बाणूरगड, ताडाचीवाडी व कुसबावडे परिसरात जनावरांची संख्या आठशे ते नऊशेच्या आसपास आहे. भौगोलिकदृष्ट्या अत्यंत उंचावर असलेली ही तीन गावे सध्या तरी कोणत्याच जलसिंचन योजनेच्या आराखड्यात समाविष्ट नाहीत. त्यामुळे या परिसरात शेतीसह पिण्याचा पाणीप्रश्नही गंभीर बनला आहे.गेल्या तीन वर्षांपासून पाऊस नसल्याने शेती भकास झाली आहेच, शिवाय पिण्याचा पाणी प्रश्नही सध्या मोठ्या प्रमाणात भेडसावू लागला आहे. बाणूरगड गावात चार ते पाच शिवकालीन विहिरी, तीन कूपनलिका आहेत. परंतु, त्यात चिमणीला पिण्याइतकेही पाणी नाही. प्रशासनाने टॅँकरने पाणीपुरवठा सुरू केला असला तरी, केवळ दीड खेप म्हणजे १५ हजार लिटर पाणी गावाला दिले जात आहे. टॅँकरच्या खेपा वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी आजही प्रलंबित असून, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.प्रशासनाने जनावरांच्या चारा व पाण्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे पशुधन धोक्यात आले असून, चाºयाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. परिणामी, येथील लोकांवर स्थलांतराची वेळ आली आहे. बाणूरगड, ताडाचीवाडी, कुसबावडे परिसरातील भीषण दुष्काळाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. विहिरी, कूपनलिका कोरड्या ठणठणीत पडल्याने पाण्याची व्यवस्था तातडीने करणे गरजेचे बनले आहे. पाणी व चारा न मिळाल्यास येथील लोकांवर जीवापाड जपलेली मूक जनावरे कवडीमोल किंमतीला विकावी लागणार आहेत. तरीही ग्रामस्थांसमोरील प्रश्नांची गर्दी थांबणार नाही.परिसरातील भीषण परिस्थितीकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही गांभीर्याने पहावे, अशी आर्त हाक बाणूरगड परिसरातील दुष्काळग्रस्तांनी दिली आहे.प्रशासन, नेत्यांकडून दुष्काळी भाग दुर्लक्षितगेल्या चार वर्षांपासून बाणूरगड परिसरात पाऊस पडला नाही. परिणामी, चारा उत्पन्न झाले नाहीच, शिवाय पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न यावर्षी मोठ्या प्रमाणात गंभीर बनला आहे. शासनाकडे टॅँकरच्या खेपा वाढवून देण्याबाबत वारंवार पाठपुरावा केला. परंतु, त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. आमच्या मागणीकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे चाºयाअभावी पशुधन धोक्यात आले आहे. चाºयासाठी जनावरे गोठ्यात हंबरडा फोडत आहेत. पण त्यांच्याकडे केवळ पाहत बसण्याशिवाय लोकांपुढे पर्याय उरला नसल्याचे बाणूरगडचे सरपंच सज्जन बाबर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.