शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

द्राक्षशेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 23:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : तालुक्याच्या सर्व भागात वादळी वाºयासह पाऊस पडत असून शनिवारी रात्रभर पाऊस पडल्याने फ्लॉवरिंग स्टेजला आलेल्या द्राक्षबागांतील घडांमध्ये पाणी साचून ते कुजत आहेत. दिवसभर ढगाळ हवामानामुळे दावण्या रोगाचा मोठा हल्ला झाला आहे. त्यामुळे द्राक्षबागायतदार हवालदिल झाले आहेत.सध्या द्राक्षाचा हंगाम ऐन बहरात आहे. दोन वर्षापूर्वी निलोफर चक्रीवादळाचा जोरदार ...

लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : तालुक्याच्या सर्व भागात वादळी वाºयासह पाऊस पडत असून शनिवारी रात्रभर पाऊस पडल्याने फ्लॉवरिंग स्टेजला आलेल्या द्राक्षबागांतील घडांमध्ये पाणी साचून ते कुजत आहेत. दिवसभर ढगाळ हवामानामुळे दावण्या रोगाचा मोठा हल्ला झाला आहे. त्यामुळे द्राक्षबागायतदार हवालदिल झाले आहेत.सध्या द्राक्षाचा हंगाम ऐन बहरात आहे. दोन वर्षापूर्वी निलोफर चक्रीवादळाचा जोरदार फटका तासगाव तालुक्यातील द्राक्षबागायतदारांना बसला होता. या धर्तीवर हवामान बिघडल्याने व पावसाने द्राक्षबागायतदार गारठले आहेत. पावसामुळे द्राक्षाचे घड कुजले असून दावण्या रोगाने आगाप द्राक्ष बागायतदार उद्ध्वस्त झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.द्राक्षपंढरी म्हणून तासगाव तालुक्याची देश-विदेशात ओळख आहे. तालुक्यात हजारो एकर क्षेत्रावर द्राक्षशेती केली जाते. तासगावची उच्च प्रतीची द्राक्षे व बेदाणा देश-विदेशात पाठविला जातो. दोन वर्षांपूर्वी निलोफर चक्रीवादळामुळे तालुक्यात पावसाने थैमान घातले होते. फ्लॉवरिंग स्टेजलाच पाऊस, धुके व ढगाळ हवामानामुळे दावण्या रोगाचा मोठ्या प्रमाणात द्राक्षबागांवर फैलाव झाला होता. शेकडो एकर क्षेत्र या रोगास बळी पडले होते.ंबागायतदार गारठलागेल्या ५ दिवसांपासून तासगाव तालुक्यात दिवसा ढगाळ हवामान आहे, तर रात्री पाऊस पडत आहे. त्यामुळे दावण्या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात बागांवर होत आहे. सध्या द्राक्षाची वांझ काढणे, डिपिंग, व फ्लॉवरिंग अवस्था आहे. यादरम्यान दावण्याचा फैलाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे द्राक्षबागायतदार गारठला आहे. औषध कंपन्यांना मात्र सुगीचे दिवस आले आहेत. दावण्या रोगाचा हल्ला रोखण्यासाठी बागायतदार महागडी विविध कंपन्यांची औषधे खरेदी करताना दिसत आहेत. मात्र गुणवत्ता कमी असल्याने त्यांचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. रब्बीच्या हरभरा, शाळू, गहू या पिकांना हा पाऊस पोषक असला तरी, द्राक्षांना मारक ठरत आहे.