शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

द्राक्षबागा धोक्यात...

By admin | Published: May 30, 2016 11:27 PM

कवठेमहांकाळ तालुक्यात चित्र : पाणीटंचाईचे संकट

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून द्राक्ष लागवडीला पसंती दिल्यानंतर तालुक्यात हळूहळू द्राक्ष बागायत क्षेत्र वाढले. हळूहळू शेतकरी निर्यातक्षम द्राक्षेही पिकवू लागला. त्याला युरोपात तसेच आखाती देशातही चांगला भाव मिळून मागणी वाढू लागली. त्यामुळे तालुक्यात द्राक्ष क्षेत्रही वाढले. पण गेल्या काही वर्षांपासून सतत कमी पडणाऱ्या पावसामुळे व हवामानाच्या लहरीपणामुळे या द्राक्ष बागायत क्षेत्राला फटका बसत आहे.बागायत क्षेत्रही घटण्यास सुरुवात झाली आहे. सततच्या दुष्काळ व सध्या पाणी टंचाईमुळे द्राक्षबागा करपू लागल्या आहेत. त्यातच हवामानाच्या हलरीपणाचा फटकाही द्राक्षबागेला बसत आहे. रोगांचे अतिक्रमण हटविण्यासाठी महागडी औषधे वापरावी लागत असून, शेतकऱ्यांना हवामानाचा वेध घेत औषधे सोबत घेऊन बागेत थांबावे लागत आहे. दुष्काळामुळे टॅँकरने पाणी देऊन बागा जगविल्या जात आहेत. तसेच भरमसाठ रोजंदारी देऊन कामगार बागेत कामाला आणावे लागतात. १२ महिने २४ तास राबूनही द्राक्षाचे दर हे परप्रांतीय दलाल ठरवित असून, ते द्राक्षाला गोडीच नाही, रंग आला नाही, अशी विविध कारणे सांगून ते दर पाडत असतात. त्यामुळे महागडी बियाणे, खते, औषधे, टॅँकरने घातलेल्या पाण्याचा खर्च तसेच रोजंदारीवर होणारा खर्च यातून १०० टक्के नफा मिळेलच असे नाही. खर्च जाता पदरात काही पडेल, याची खात्रीही नाही.कमी पावसाने कूपनलिका, विहिरींनीही तळ गाठला आहे. द्राक्षबागा जतन करण्यासाठी टॅँकरने पाणी आणावे लागत असून, काही शेतकरी आर्थिक भुर्दंड सोसून दुसऱ्या ठिकाणी कूपनलिका खोदत आहेत. सगळीकडे कूपनलिका यंत्रांची घरघर ऐकू येत आहे. कूपनलिका खोदण्यासाठी पंधरा-पंधरा दिवस थांबावे लागत आहे. परंतु ज्या बळिराजाची आर्थिक स्थिती नाजूक आहे, अशांवर बागा सोडून देण्याची वेळ प्रशासनाने आणली आहे. (वार्ताहर) योजना : कागदावरतालुक्यातील काही भागात जलसिंचनाचे काम झाले आहे. सध्या म्हैसाळ योजनेत आवर्तनही चालू आहे. त्याचा काही भागाला लाभ होईल, परंतु तालुक्यातील बराच भाग अद्यापही सिंचन योजनेपासून वंचित आहे. तेथे ना म्हैसाळ योजना, ना टेंभू योजना. तेथील योजना या फक्त कागदावरच आहेत.