शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
3
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
4
सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?
5
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
6
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
7
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
8
Suicide Blast: पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
9
नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट
10
'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार
11
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
12
१४,००० मुले उपाशी; २२ देशांचा इस्रायलवर दबाव, इस्रायलवर निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा
13
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
14
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
15
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
16
पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 
17
तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट
18
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
19
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
20
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट

भविष्यात विवेकवादाचा आवाज संपविण्याचा धोका

By admin | Updated: May 20, 2015 00:08 IST

मेघा पानसरे : व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रतिसाद

सांगली : भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत केंद्रस्थानी आल्यापासून देशभरातील धर्मांध शक्तींचा उद्रेक वाढत चालला आहे. यामुळे भविष्यात विवेकवादी विचारसरणीचा आवाज संपविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मत डॉ. मेघा पानसरे यांनी सोमवारी व्यक्त केले. बहुजन हिताय शिक्षण व संशोधन संस्थेतर्फे आयोजित केलेल्या व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात ‘पुरोगामी कार्यकर्त्यांपुढील आव्हाने’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. डॉ. पानसरे म्हणाल्या, गोविंदराव पानसरे यांनी आयुष्यभर कार्यकर्त्यांची पुरोगामी बैठक पक्की करण्याचे कार्य केले होते. परंतु त्यांच्यावर भ्याड हल्ला करुन त्यांचा खून करण्यात आला. पुरोगामी नेत्यांचे काहींशी वाद होते. कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या टोल आंदोलनात पानसरे अग्रभागी होते. कोणालाही न घाबरता त्यांनी वाढत्या धर्मांध शक्तींविरोधात उभे राहण्याचे धाडस दाखविले होते. शंकराचार्य यांनी चातुर्वर्णाचा पुरस्कार केला होता. त्यांचा कोल्हापूर येथील कार्यक्रम पानसरे यांच्या प्रखर विरोधामुळे रहित करावा लागला होता. त्यांचा कर्मकांडांना विरोध होता. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पानसरे यांचे हल्लेखोर मोकाट फिरत असतील, तर भविष्यातही पुरोगामी विचारांच्या व्यक्तींच्या हत्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुनर्जन्म, पाप-पुण्य याबाबत भ्रामक प्रचार सुरु असून त्याविरोधात समतेचा विचार समाजमनात रुजविण्याचे आव्हान आपल्यापुढे असल्याचेही डॉ. पानसरे यांनी सांगितले.शिबिराचे उद्घाटन माजी न्यायाधीश सी. एल. थूल यांनी केले. यावेळी त्यांनी बहुजन विद्यार्थ्यांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळविण्याचे आवाहन केले. राजाभाऊ पद्माळकर, अ‍ॅड. के. डी. शिंदे उपस्थित होते. (प्रतिनिधी)