शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

भविष्यात विवेकवादाचा आवाज संपविण्याचा धोका

By admin | Updated: May 20, 2015 00:08 IST

मेघा पानसरे : व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रतिसाद

सांगली : भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत केंद्रस्थानी आल्यापासून देशभरातील धर्मांध शक्तींचा उद्रेक वाढत चालला आहे. यामुळे भविष्यात विवेकवादी विचारसरणीचा आवाज संपविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मत डॉ. मेघा पानसरे यांनी सोमवारी व्यक्त केले. बहुजन हिताय शिक्षण व संशोधन संस्थेतर्फे आयोजित केलेल्या व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात ‘पुरोगामी कार्यकर्त्यांपुढील आव्हाने’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. डॉ. पानसरे म्हणाल्या, गोविंदराव पानसरे यांनी आयुष्यभर कार्यकर्त्यांची पुरोगामी बैठक पक्की करण्याचे कार्य केले होते. परंतु त्यांच्यावर भ्याड हल्ला करुन त्यांचा खून करण्यात आला. पुरोगामी नेत्यांचे काहींशी वाद होते. कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या टोल आंदोलनात पानसरे अग्रभागी होते. कोणालाही न घाबरता त्यांनी वाढत्या धर्मांध शक्तींविरोधात उभे राहण्याचे धाडस दाखविले होते. शंकराचार्य यांनी चातुर्वर्णाचा पुरस्कार केला होता. त्यांचा कोल्हापूर येथील कार्यक्रम पानसरे यांच्या प्रखर विरोधामुळे रहित करावा लागला होता. त्यांचा कर्मकांडांना विरोध होता. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पानसरे यांचे हल्लेखोर मोकाट फिरत असतील, तर भविष्यातही पुरोगामी विचारांच्या व्यक्तींच्या हत्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुनर्जन्म, पाप-पुण्य याबाबत भ्रामक प्रचार सुरु असून त्याविरोधात समतेचा विचार समाजमनात रुजविण्याचे आव्हान आपल्यापुढे असल्याचेही डॉ. पानसरे यांनी सांगितले.शिबिराचे उद्घाटन माजी न्यायाधीश सी. एल. थूल यांनी केले. यावेळी त्यांनी बहुजन विद्यार्थ्यांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळविण्याचे आवाहन केले. राजाभाऊ पद्माळकर, अ‍ॅड. के. डी. शिंदे उपस्थित होते. (प्रतिनिधी)