शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे पंचनामे

By admin | Updated: November 26, 2014 00:07 IST

मिरजेत आदेश : पंचनाम्यानंतरच नुकसानीचा निर्णय

मिरज : मिरज तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष व फळबागांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार किशोर घाडगे यांनी आज (सोमवारी) पंचायत समितीत आयोजित बैठकीत दिले. पंचनाम्यांचा अहवाल सादर झाल्यानंतर नुकसानीचा निर्णय शासनस्तरावर होणार आहे.जिल्ह्यात ११ ते १६ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम द्राक्ष व फळबागांवर झाला आहे. नुकसानग्रस्त फळबागांचे व द्राक्षबागांचे पंचनामे करून नुकसानभरपाईची शेतकऱ्यांची मागणी आहे. शासनाने बागायती पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मिरज तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्षबागा व फळबागांचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदार घाडगे यांनी मिरज पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांची बैठक घेतली. बैठकीत प्रत्येक गावनिहाय पंचनाम्याची जबाबदारी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक या तिघांवर सोपविण्यात आली. मिरज तालुक्यात म्हैसाळ योजनेमुळे द्राक्ष व फळबागांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. अवकाळी पावसाने छाटणी होऊन फुले आली होती. अशा नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे या तिघांकडून पंचनामे होणार आहेत. पंचनाम्याचे ५० टक्के व त्याहून अधिक नुकसान असे वर्गीकरण करण्यात येणार आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्याकडून प्राप्त होणारा अहवाल शासनाकडे सादर होणार आहे. याचा निर्णय शासनस्तरावर होणार असल्याचे तहसीलदार घाडगे यांनी सांगितले. अवकाळी पावसाने मिरज तालुक्यातील द्राक्षबागांवर रोगराईचा दुष्परिणाम झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शासनाने नुकसानग्रस्त द्राक्ष व फळबागांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)