शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

द्राक्ष, डाळिंबाचे ३९ कोटींचे नुकसान

By admin | Updated: November 17, 2014 23:22 IST

जिल्ह्यातील स्थिती : कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज; ३७९९ हेक्टर पिकांची अवकाळीने हानी

सांगली : जिल्ह्यात आठ दिवस ढगाळ वातावरण असल्याने आणि जोरदार पाऊस झाल्यामुळे ३७९९ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, डाळिंब, केळीच्या बागांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. या पिकांचे एकरी ५० हजार नुकसान धरल्यास सुमारे ३९ कोटींचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. ढगाळ हवा आणि पावसामुळे रोग पसरू नयेत म्हणून गेल्या आठ दिवसात सुरू असलेल्या औषध फवारणीचा आकडा कोट्यवधीच्या घरात पोहोचला आहे. या शेतकऱ्यांना शासनाने पॅकेजच्या माध्यमातून हातभार लावण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.मागील आठवड्यात आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे अवकाळी पावसाचा तडाखा बसला. पाऊस आणि ढगाळ वातावरणाने जिल्ह्यातील द्राक्षबागांवर संकटाचे ढग दाटले आहेत. निसर्गाच्या या माऱ्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तासगाव, पलूस, मिरज, खानापूर, वाळवा, शिराळा, जत, कडेगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यांत नुकसानीची टांगती तलवार लटकत आहे. ज्या बागा फुलोऱ्यात (फ्लॉवरिंग स्टेज) आहेत, त्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. २० ते ६० टक्के द्राक्षघडांची गळ झाली आहे. दावण्याचा फैलाव होऊ नये म्हणून औषध फवारणीही सुरू आहे. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या द्राक्ष, डाळिंब बागांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली होती. त्यानुसार कृषी विभागाने बागांची पाहणी केली आहे. याविषयी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे म्हणाले की, आम्ही सर्व द्राक्ष, डाळिंब बागांची जागेवर जाऊन पाहणी केली आहे. जिल्ह्यातील दहा हेक्टर केळी, २६६९ हेक्टर द्राक्ष आणि १११५ हेक्टर डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे. या सर्व बागांचे ५० टक्क्यपेक्षा कमी नुकसान झाले असले तरीही उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे.कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव, खानापूर, जत तालुक्यातील द्राक्ष, डाळिंब बागांचे सर्वधिक नुकसान झाले आहे. एकरी ५० हजार नुकसान धरल्यास २६६९ हेक्टरवरील द्राक्षबागांना ३३ कोटी ३६ लाख रुपयांचा फटका बसणार आहे. जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील एक हजार ११५ हेक्टर डाळिंब बागांचेही नुकसान झाले आहे. एकरी ५० हजार नुकसान धरल्यास ५.६५ कोटीचे नुकसान होणार आहे. शासकीय आकडेवारीनुसार सर्व नुकसानीचा आकडा ३९ कोटीपर्यंत पोहोचत आहे. दावण्या आणि द्राक्षाच्या घडात पाणी साचून राहिल्यामुळे निर्माण झालेल्या फळकुजव्या रोगामुळे मोठे नुकसान होणार आहे. दुसऱ्या बाजूला रोग येऊ नये म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करत आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात एक लाखाहून अधिक द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. त्यापैकी ४०,००० एकर क्षेत्रावरील द्राक्षबागांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. १० ते २५ आॅक्टोबरदरम्यान छाटण्या झालेल्या द्राक्षबागांचे ६० टक्क्याहून अधिक नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना द्राक्ष बागायतदार संघातर्फे औषध फवारणीसंबंधी मार्गदर्शन केले आहे.-सुभाष आर्वे, द्राक्ष बागायतदारपिकांचे नुकसान (आकडे हेक्टरमध्ये)तालुकाद्राक्षडाळिंबक.महांकाळ५५०४६०खानापूर१८०५आटपाडी३१२००तासगाव६००—पलूस३१८—जत४४०४५०मिरज५५०—एकूण२६६९१११५