शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

वाळवा तालुक्यात १३ हजार ५०० हेक्टर पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:27 IST

इस्लामपूर : कृष्णा आणि वारणा नदीला आलेला पूर आणि पावसाच्या अतिवृष्टीमुळे वाळवा तालुक्यातील १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील शेती ...

इस्लामपूर : कृष्णा आणि वारणा नदीला आलेला पूर आणि पावसाच्या अतिवृष्टीमुळे वाळवा तालुक्यातील १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी अधिकारी भगवानराव माने यांनी दिली. खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती आणि पूर काळात संपर्कासाठी रस्त्यांची उंची वाढविण्याचा ठराव शुक्रवारी करण्यात आला.

पंचायत समिती सभागृहात सभापती शुभांगी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपसभापती नेताजीराव पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सहायक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली.

कृषी अधिकारी माने यांनी पीक नुकसानीची माहिती दिली. ते म्हणाले की, वारणाकाठची १३ आणि कृष्णाकाठची २७ गावे पुराने बाधित झाली. उर्वरित ५४ गावांत अतिवृष्टीने सोयाबीन, भुईमूग आणि लागण केलेल्या ऊस पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. आठ दिवसात पूरबाधित गावांतील पंचनामे पूर्ण केले जाणार आहेत. त्यानंतर इतर गावांतील पंचनामे करण्यात येतील. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषी सहायक आणि तलाठी यांच्याशी संपर्क साधून माहिती द्यावी.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत १४ गावांमध्ये टँकरने पाणी दिले जात आहे. बंद पडलेल्या पाणी योजना सुरू करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याचे उपअभियंता आर. जी. कांबळे यांनी सांगितले. पावसामुळे दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून पूर काळात संपर्क राहण्यासाठी रस्त्यांची उंची वाढविण्याची सूचना उपसभापती नेताजीराव पाटील यांनी केली. चर्चेत राजश्री फसाले, पी. टी. पाटील, मारुती खोत, आशिष काळे यांनी भाग घेतला.

तालुक्यात ९८ टक्के नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस

तालुक्यातील ९८ टक्के नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस आणि ४० टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी सांगितले. पूरबाधित गावांतील जनावरांचे लसीकरण आणि औषधोपचार करण्यात येत आहेत. मृत जनावरे आणि कोंबड्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्याचे प्रस्ताव तहसील कार्यालयास सादर केल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांनी सांगितले.

तालुक्यातील सर्व जि. प. शाळांना १५ व्या वित्त आयोगातून स्मार्ट टीव्ही देण्यात आले आहेत.