शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

वाळवा तालुक्यात १३ हजार ५०० हेक्टर पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:27 IST

इस्लामपूर : कृष्णा आणि वारणा नदीला आलेला पूर आणि पावसाच्या अतिवृष्टीमुळे वाळवा तालुक्यातील १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील शेती ...

इस्लामपूर : कृष्णा आणि वारणा नदीला आलेला पूर आणि पावसाच्या अतिवृष्टीमुळे वाळवा तालुक्यातील १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी अधिकारी भगवानराव माने यांनी दिली. खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती आणि पूर काळात संपर्कासाठी रस्त्यांची उंची वाढविण्याचा ठराव शुक्रवारी करण्यात आला.

पंचायत समिती सभागृहात सभापती शुभांगी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपसभापती नेताजीराव पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सहायक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली.

कृषी अधिकारी माने यांनी पीक नुकसानीची माहिती दिली. ते म्हणाले की, वारणाकाठची १३ आणि कृष्णाकाठची २७ गावे पुराने बाधित झाली. उर्वरित ५४ गावांत अतिवृष्टीने सोयाबीन, भुईमूग आणि लागण केलेल्या ऊस पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. आठ दिवसात पूरबाधित गावांतील पंचनामे पूर्ण केले जाणार आहेत. त्यानंतर इतर गावांतील पंचनामे करण्यात येतील. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषी सहायक आणि तलाठी यांच्याशी संपर्क साधून माहिती द्यावी.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत १४ गावांमध्ये टँकरने पाणी दिले जात आहे. बंद पडलेल्या पाणी योजना सुरू करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याचे उपअभियंता आर. जी. कांबळे यांनी सांगितले. पावसामुळे दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून पूर काळात संपर्क राहण्यासाठी रस्त्यांची उंची वाढविण्याची सूचना उपसभापती नेताजीराव पाटील यांनी केली. चर्चेत राजश्री फसाले, पी. टी. पाटील, मारुती खोत, आशिष काळे यांनी भाग घेतला.

तालुक्यात ९८ टक्के नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस

तालुक्यातील ९८ टक्के नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस आणि ४० टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी सांगितले. पूरबाधित गावांतील जनावरांचे लसीकरण आणि औषधोपचार करण्यात येत आहेत. मृत जनावरे आणि कोंबड्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्याचे प्रस्ताव तहसील कार्यालयास सादर केल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांनी सांगितले.

तालुक्यातील सर्व जि. प. शाळांना १५ व्या वित्त आयोगातून स्मार्ट टीव्ही देण्यात आले आहेत.