शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

दीड लाख नव्हे, संपूर्ण कर्जमाफी हवी : रघुनाथदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 20:35 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक वेळी कर्जमाफीच्या वेगवेगळ्या घोषणा करून शेतक-यांची फसवणूक करीत आहेत.

सांगली, दि. 28 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक वेळी कर्जमाफीच्या वेगवेगळ्या घोषणा करून शेतक-यांची फसवणूक करीत आहेत. कर्जमाफीच द्यायची आहे, तर अर्जाच्या नावाखाली वेळकाढूपणा कशासाठी करता ?, असा सवाल शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच दीड लाख नव्हे, संपूर्णच कर्जमाफी झाली पाहिजे, यासाठी आर या पारची लढाई लढण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे, असा इशाराही त्यांनी दिला.ते पुढे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. या शेतक-यांना कर्जातून मुक्त करण्याची जबाबदारी शासनाचीच आहे. कर्जमाफी करून शेतक-यांवर उपकार करण्याची काहीच गरज नाही. कर्जमाफीचा एकदा निर्णय घेतल्यानंतर, दहा वेळा शासनाने आदेश बदलण्याची काहीच गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफीची घोषणा केली जाते. पण त्यांच्यासारखे तात्त्विक धोरण राबविण्यात मुख्यमंत्री फडणवीस पूर्णत: अपयशी ठरले आहेत. कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असताना शेतक-यांकडून अर्ज भरून पुन्हा काय साध्य करणार आहेत? शेतक-यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचे एकमेव धोरण फडणवीस सरकारचे आहे. त्यामुळे शेतक-यांनी शासनाकडून जाहीर केलेले कोणतेही अर्ज भरून देऊ नयेत, ते पूर्णत: बोगस आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याच अधिवेशनात शंभर टक्के कर्जमुक्ती शेतक-यांना दिली पाहिजे. ज्या शेतक-यांनी कर्ज भरले असेल, त्यांनाही पैसे परत दिले पाहिजेत. याबद्दल ठोस निर्णय न झाल्यास रस्त्यावरील लढाई करून सरकारला  कोंडीत पकडल्याशिवाय राहणार नाही. १५ ऑगस्ट रोजी एकाही मंत्र्याला ध्वजारोहण करू देणार नाही. राज्यभरातील शेतक-यांच्या मनामध्ये प्रचंड उद्रेक असल्यामुळे शेतकरी आणि त्यांची पोरे पेटून उठली आहेत. तेच मंत्र्यांना ध्वजारोहण करण्यापासून रोखणार आहेत, असा इशाराही रघुनाथदादांनी दिला. ध्वजारोहणास आमचा विरोध नसून मंत्र्यांऐवजी जिल्हाधिकारी, कर्मचारी अथवा शेतकºयांच्या हस्ते ध्वजारोहण केल्यास त्याचे आम्ही स्वागतच करू, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचा सज्जनपणाचा आवचमुख्यमंत्री फडणवीस सज्जन असल्याचा आव आणत आहेत. प्रत्यक्षात भ्रष्टाचारी आमदार, मंत्र्यांवर ते काहीच कारवाई करीत नाहीत. महाराष्ट्रात एकटे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हेच भ्रष्टाचारी आहेत, उर्वरित राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील मंत्री सज्जन आहेत का? त्यांच्यावर कारवाईचा एकही शब्द फडणवीस बोलत नाहीत. म्हणजेच मुख्यमंत्री केवळ सज्जनपणाचा आव आणत असल्याची टीकाही रघुनाथदादांनी केली.बैलगाडी शर्यतीवरील जाचक अटी थांबवा शेतकºयांच्या दबावामुळे अखेर केंद्र आणि राज्य सरकारला झुकावे लागले. म्हणूनच बैलगाडी शर्यतीवरील बंदी शासनाने उठविली आहे. याचप्रमाणे बैलगाडी शर्यती घेण्यासाठी लादलेल्या जाचक अटींतूनही शेतक-यांची सुटका करा. अन्यथा त्यासाठी पुन्हा आम्हाला लढा उभारावा लागेल, असा इशाराही रघुनाथदादांनी दिला. तसेच गोवंश हत्येवरील बंदीही केंद्र व राज्य सरकारने उठवावी, अशीही त्यांनी मागणी केली.