शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

दहीवीची परीक्षा रद्द केली, परीक्षा शुल्क कधी परत करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:26 IST

सांगली : दहावीची परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केल्यानंतर आता पुढे काय? हा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शाळांपुढे आहे. पुढील ...

सांगली : दहावीची परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केल्यानंतर आता पुढे काय? हा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शाळांपुढे आहे. पुढील शैक्षणिक प्रवेशासोबतच दहावी परीक्षेचे शुल्क परत केले जाणार काय? हादेखील प्रश्न आहे. यासंदर्भात शासन किंवा बोर्डाकडून कोणत्याही सूचना किंवा मार्गदर्शन आलेले नाही.

जिल्ह्यात ४० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेचा फॉर्म भरला आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे परीक्षा रद्द केल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. त्यामुळे अकरावी, डिप्लोमा, आयटीआय आदी प्रवेश प्रक्रिया कशी पार पडणार? असा प्रश्न शाळांपुढे आहे. शासनाने सीईटी घेण्याचे सुतोवाच केले आहे; पण वेगवेगळ्या शिक्षणक्रमांसाठी एकच सीईटी चालणार काय? व्यावसायिक शिक्षणक्रमासाठीचा आवश्यक अभ्यासक्रम सीईटीमध्ये असेल काय? असे प्रश्न शिक्षणतज्ज्ञांकडून उपस्थित होत आहेत. दहावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना वर्गोन्नत केले आहे. तथापि, त्यांचे मूल्यांकन होणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे. मूल्यांकनाविषयी कोणत्याही सूचना किंवा मार्गदर्शन शाळांना अद्याप मिळालेले नाही. मूल्यांकनामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळेल याचा भरवसा नाही. याचा परिणाम पुढील प्रवेशावर होणार आहे. विशेषत: अभियांत्रिकी डिप्लोमा व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये गुणवंत विद्यार्थी मागे पडण्याची भीती पालकांमधून व्यक्त होत आहे. नामांकित महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठीही त्यांना संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत.

कोट

परीक्षा होणार नसल्याचे बातम्यांमधूनच कळाले. मार्कलिस्ट किंवा बोर्ड सर्टिफिकेटविषयीदेखील काहीही माहिती नाही. शाळांमध्ये चैाकशी केली असता शिक्षकांनाही माहिती नाही. माझे मूल्यांकन कसे होणार, यावर पुढील प्रवेशाचा निर्णय घेणार आहे.

- साहिल कट्टेगिरी, विद्यार्थी, मिरज

दहावीनंतर डिप्लोमा प्रवेश घेणार होतो; पण आता सारेच अनिश्चित आहे. डिप्लोमाची मेरिट लिस्ट कशी तयार होणार, याची धाकधूक आहे. डिप्लोमाचे गणित जमले नाही तर अकरावीला प्रवेश घेईन. बारावी पूर्ण करूनच व्यावसायिक शिक्षणक्रमाचा विचार करावा लागेल.

- विनय जोशी, विद्यार्थी, सांगली

दहावीच्या परीक्षेचा अभ्यास केला होता, परीक्षा रद्द झाल्याने भ्रमनिरास झाला. पुढील प्रवेशासाठी सीईटी होणार असल्याचे सांगितले जात आहे; पण त्याची तयारी कशी करायची याची काहीही माहिती नाही. शिक्षण विभाग कोणता निर्णय घेते, यावर लक्ष ठेवून आहे.

- वैदेही कोकणे, विद्यार्थिनी, सांगली.

दहावी परीक्षा रद्द झाली तरी परीक्षा शुल्क परत करण्याविषयी शासनाकडून कोणत्याही सूचना नाहीत. परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका छापून तयार होत्या. अन्य तयारीही झाली होती. त्यामुळे परीक्षा शुल्क परत करताना शासन याचाही विचार करेल असे वाटते. वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश येईल त्यानुसार कार्यवाही होईल.

- विष्णू कांबळे, शिक्षणाधिकारी

पॉइंटर्स

दहावीतील एकूण विद्यार्थी - ४०,८४४

परीक्षा शुल्काची एकूण रक्कम - १,४७,३,८४०

जिल्ह्यातील एकूण शाळा - ७५०

प्रति विद्यार्थी परीक्षा शुल्क - ३६०