शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या सभेत ‘दादा-बापू’ वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2015 00:05 IST

अहवालात छायाचित्राची मागणी : दिलीपतात्यांकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

सांगली : जिल्ह्याच्या राजकारणात कधीकाळी वसंतदादा पाटील व राजारामबापू पाटील यांच्यातील राजकीय वाद गाजला होता. त्याचे पडसाद अधुनमधून विविध संस्थांत उमटत असतात. सध्या वाळवा पंचायत समितीच्या सभागृहाच्या नामकरणाचा वाद रंगला असतानाच, बुधवारी जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेतही त्याचे पडसाद उमटले. शिराळ्यातील एका सभासदाने बँकेच्या वार्षिक अहवालात दादांचे छायाचित्र असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तोपर्यंत वाळव्याच्या एका सभासदाने राजारामबापूंच्या छायाचित्राचाही आग्रह धरला. हा वाद रंगण्यापूर्वी अध्यक्षांनी त्यावर पडदा टाकला. वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यामधील राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला सर्वज्ञात आहे. या वादाला वरचे वर उजाळा देण्याचे काम दादा, बापू गटाचे समर्थक करीत असतात. सध्या वाळवा पंचायत समितीच्या नवीन इमारतीमधील सभागृहाला राजारामबापूंचे नाव देण्याच्या ठरावावरून वाद रंगला आहे. वसंतदादांच्या नावे असलेले जुने सभागृह पाडले जाणार असल्याने दादांचे नावच जमीनदोस्त होणार आहे. वाळवा तालुक्यात दादा-बापूंच्या नावावरून वाद रंगला असताना, बुधवारी जिल्हा बँकेतही या जुन्या वादाला पुन्हा उजाळा देण्यात आला. बँकेच्या वार्षिक अहवालात केवळ आमदार जयंत पाटील यांच्यासह बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांची छायाचित्रे आहेत. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाही अहवालात आदरांजली वाहण्यात आली आहे. शिराळा येथील विलास पाटील या सभासदाने वार्षिक अहवालात वसंतदादा पाटील यांचे छायाचित्र समाविष्ट करावे, अशी मागणी केली. वसंतदादांनी बँक सक्षमपणे उभी केली आहे. त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यामुळे या मागणीचा विचार व्हावा, असे मत व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यावर संचालक विशाल पाटील व इतर काँग्रेसचे संचालक व्यासपीठावर टाळ्या वाजवत होते. त्याचवेळी या सभासदाला अध्यक्ष दिलीप पाटील यांनी रोखले. हा सभासद दुसरा मुद्दा मांडत असताना त्याला सभेत बोलू दिले नाही. तुम्हीच एकटे किती वेळ बोलणार, दुसऱ्या सभासदांनाही संधी मिळावी, असे म्हणत त्यांच्याकडील ध्वनिक्षेपक काढून घेतला. तोपर्यंत येलूर येथील सभासद युवराज सूर्यवंशी यांनी, सहकार क्षेत्रात राजारामबापू पाटील यांनी मोठे काम केले आहे. त्यांचेही छायाचित्र अहवालात असावे, असा आग्रह धरला. हा वाद रंगण्याची चिन्हे दिसू लागताच, दोन्ही सभासदांना खाली बसविण्यात आले. (प्रतिनिधी)सभासद काय म्हणाले...रघुनाथ गायकवाड : मध्यम मुदतीच्या कर्जासाठी वाडवडिलांपासूनचे फेरफार मागितले जातात. त्यामुळे हे कर्ज मंजूर करून घेताना सभासदांना यमयातना होत आहेत. ऊस पिकाला कारखान्याचे हमीपत्र द्यावे लागते. द्राक्ष, मका, हळद लावल्यावर हमीपत्र का मागत नाही? तानाजी शिंदे : जिल्हा बँकेने सोसायट्यांमार्फतच शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करावा. राजकीय नेत्यांच्या थकबाकी वसुलीसाठी बँकेचा वरिष्ठ अधिकारी द्यावा.नामदेव चव्हाण : एखाद्याचे सामान्य कर्ज थकले, तर इतर सभासदांना कर्ज दिले जात नाही, हा नियम बदलावा.प्रभाकर पाटील : बँकेच्या ठेवीदारांचे दोन प्रतिनिधी संचालक म्हणून घ्यावेत. गैरव्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे बँक विश्वास गमावत आहे. त्यांच्यावर कारवाई करावी.