शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

महामार्गांसाठी ४५००० झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:23 IST

सांगली : महामार्गांमुळे जिल्ह्यात समृद्धीची हिरवाई फुलणार असली तरी त्यासाठी झाडांच्या दोन-चार पिढ्यांचा बळी जाणार आहे. रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर ...

सांगली : महामार्गांमुळे जिल्ह्यात समृद्धीची हिरवाई फुलणार असली तरी त्यासाठी झाडांच्या दोन-चार पिढ्यांचा बळी जाणार आहे. रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर महामार्गांसाठी तब्बल ४५ हजारांहून अधिक झाडे तोडली जाणार आहेत. आतापर्यंत सुमारे वीस हजार झाडांच्या कत्तलीची मोहिम फत्ते झाली आहे. त्यांचे पुनर्रोपण किंवा नव्याने वृक्षलागवडीकडे कोणाचेच लक्ष नाही. पर्यावरणप्रेमींमधूनही उठाव नसल्याची दु:खदायी स्थिती आहे.

रत्नागिरी-नागपूर महामार्गाचा (क्रमांक एनएच १६६) ६६ किलोमीटर भाग व गुहागर-विजापूर (क्रमांक १६६ ई अणि एनएच २६६) महामार्गाचा सुमारे १९० किलोमीटर भाग जिल्ह्यातून जातो. यासाठी दुतर्फाची ४५ हजार झाडे तोडली जात आहेत. तोडलेल्या प्रत्येक झाडासाठी नव्याने पाच झाडे लावण्याची अट आहे. कोठेही वृक्षारोपण सुरु केलेल

िल्ह वृक्षलागवड मोहिमेत गेल्या पाच वर्षांत ९२ लाख ११ हजार ८५५ झाडे लावली गेली. वनविभाग आणि सामाजिक वनीकरणाने ही लागवड केली. यात वनविभागाने ३७ लाख ५५ हजार झाडे लावली. ऑक्टोबरच्या पाहणीनुसार त्यापैकी ३१ लाख ३१ हजार झाडे जिवंत आहेत. सप्टेंबर २०१९ पासून वृक्षलागवड झालेली नाही. यंदा कोरोनामुळे वृक्षारोपण झाले नाही.

जिल्ह्यात ४१ हजार हेक्टर जंगल क्षेत्र

जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ८ लाख ६१ हजार हेक्टर आहे. त्यापैकी ४१ हजार ५७५ हेक्टर जंगलक्षेत्र आहे. म्हणजे फक्त ४.३ टक्के जंगलक्षेत्र आहे. दरवर्षी तेथे शासन व लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड होते. वृक्षतोड अधिक झाडे तोडण्यात येत आहेत. त्यामध्ये जंगलासोबतच खासगी झाडांचाही समावेश आहे. आहे. त्याच्या बदल्यात नवी वृक्ष लागवड सुरु झालेली नाही.

‘महामार्गासाठीची वृक्षतोड प्रक्रिया पारदर्शी नाही. विकासप्रकल्पाच्या नावाखाली रेटून तोड सुरु आहे. तोडल्या जाणारया झाडांचा हिशेबही ठेवलेला नाही. शेकडो वर्षे जुनी वड-पिंपळाची झाडे जमिनदोस्त केली जात आहेत. महामार्ग झाला पाहिजे, पण पर्यावरणाचे भानही ठेवायला हवे’

-- अजित पाटील, मानद सदस्य, वन्यजीव समिती