शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

महामार्गांसाठी ४५००० झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:23 IST

सांगली : महामार्गांमुळे जिल्ह्यात समृद्धीची हिरवाई फुलणार असली तरी त्यासाठी झाडांच्या दोन-चार पिढ्यांचा बळी जाणार आहे. रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर ...

सांगली : महामार्गांमुळे जिल्ह्यात समृद्धीची हिरवाई फुलणार असली तरी त्यासाठी झाडांच्या दोन-चार पिढ्यांचा बळी जाणार आहे. रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर महामार्गांसाठी तब्बल ४५ हजारांहून अधिक झाडे तोडली जाणार आहेत. आतापर्यंत सुमारे वीस हजार झाडांच्या कत्तलीची मोहिम फत्ते झाली आहे. त्यांचे पुनर्रोपण किंवा नव्याने वृक्षलागवडीकडे कोणाचेच लक्ष नाही. पर्यावरणप्रेमींमधूनही उठाव नसल्याची दु:खदायी स्थिती आहे.

रत्नागिरी-नागपूर महामार्गाचा (क्रमांक एनएच १६६) ६६ किलोमीटर भाग व गुहागर-विजापूर (क्रमांक १६६ ई अणि एनएच २६६) महामार्गाचा सुमारे १९० किलोमीटर भाग जिल्ह्यातून जातो. यासाठी दुतर्फाची ४५ हजार झाडे तोडली जात आहेत. तोडलेल्या प्रत्येक झाडासाठी नव्याने पाच झाडे लावण्याची अट आहे. कोठेही वृक्षारोपण सुरु केलेल

िल्ह वृक्षलागवड मोहिमेत गेल्या पाच वर्षांत ९२ लाख ११ हजार ८५५ झाडे लावली गेली. वनविभाग आणि सामाजिक वनीकरणाने ही लागवड केली. यात वनविभागाने ३७ लाख ५५ हजार झाडे लावली. ऑक्टोबरच्या पाहणीनुसार त्यापैकी ३१ लाख ३१ हजार झाडे जिवंत आहेत. सप्टेंबर २०१९ पासून वृक्षलागवड झालेली नाही. यंदा कोरोनामुळे वृक्षारोपण झाले नाही.

जिल्ह्यात ४१ हजार हेक्टर जंगल क्षेत्र

जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ८ लाख ६१ हजार हेक्टर आहे. त्यापैकी ४१ हजार ५७५ हेक्टर जंगलक्षेत्र आहे. म्हणजे फक्त ४.३ टक्के जंगलक्षेत्र आहे. दरवर्षी तेथे शासन व लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड होते. वृक्षतोड अधिक झाडे तोडण्यात येत आहेत. त्यामध्ये जंगलासोबतच खासगी झाडांचाही समावेश आहे. आहे. त्याच्या बदल्यात नवी वृक्ष लागवड सुरु झालेली नाही.

‘महामार्गासाठीची वृक्षतोड प्रक्रिया पारदर्शी नाही. विकासप्रकल्पाच्या नावाखाली रेटून तोड सुरु आहे. तोडल्या जाणारया झाडांचा हिशेबही ठेवलेला नाही. शेकडो वर्षे जुनी वड-पिंपळाची झाडे जमिनदोस्त केली जात आहेत. महामार्ग झाला पाहिजे, पण पर्यावरणाचे भानही ठेवायला हवे’

-- अजित पाटील, मानद सदस्य, वन्यजीव समिती