शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

सध्या देशात न्याय मागणारा शेतकरीच देशद्रोही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST

सावंतपूर : सध्या देशात सर्वधर्मसमभाव विसरून धर्माच्या राजकारणात हुकूमशाही निर्माण झाल्याने भारतीय राजघटना धोक्यात आली आहे. आज काळ ...

सावंतपूर : सध्या देशात सर्वधर्मसमभाव विसरून धर्माच्या राजकारणात हुकूमशाही निर्माण झाल्याने भारतीय राजघटना धोक्यात आली आहे. आज काळ भयानक आहे. दोन महिने आंदोलन करणारा, न्याय मागणारा शेतकरी देशद्रोही ठरतो आहे, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक विश्वनाथ गायकवाड यांनी व्यक्त केली.

समाजवादी प्रबोधिनी, लोकशाही वाचवा कृतिशील विचारमंच, श्री समर्थ साहित्य कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, पलूस ,व्ही. वाय. पाटील प्रबोधन अकॅडमी यांच्या वतीने रामानंदनगर (ता. पलूस) येथे अठरावे परिवर्तन साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून गायकवाड बोलत होते. या आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक विचारमंचावर आयोजित संमेलनाचे उद्घाटन कथाकार हिंमत पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ विचारवंत व्ही.वाय. पाटील, संमेलनाध्यक्ष विश्वनाथ गायकवाड, स्वागताध्यक्ष संदीप नाझरे, निमंत्रक कवि किरण शिंदे, प्रा. रवींद्र येवले यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनाध्यक्ष गायकवाड म्हणाले, हुकुमशाही सगळ्यात जास्त शब्दांना घाबरते. त्यामुळे या अस्वस्थ वातावरणावर लेखणी पाजळली पाहिजे. शब्दांचे सामर्थ्य सूर्यबिंबासारखे विशाल आहे. या परिस्थितीत भूमिका घेऊन शब्दांचा वापर आज आपण नाही केला तर साहित्यिक म्हणून आपण करंटे ठरू, असे वाटते.

हिंमत पाटील म्हणाले, कवी हा अस्वस्थ वर्तमानाचा भाष्यकार असतो. राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचे गांभीर्य अधिक जिवंत करण्याचे सामर्थ्य कवितेत असते.

कवी सरकार इंगळीकर, रघुराज मेटकरी, रमजान मुल्ला, प्रा. लता ऐवळे-कदम, ऋचा वाघमारे, पतू हेरवाडे, ए.डी. पाटील, चंद्रकांत देशमुखे आदींसह अन्य कवींनी कविता सादर केल्या.

चौकट

इलाही जमादार यांना श्रद्धांजली

या संमेलनात कवी रमजान मुल्ला यांनी,

‘वाचलेली एकलेली माणसे गेली कुठे,

पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे’ ही इलाही जमादार यांची गझल गावून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

फोटो-०१सावंतपूर१

फोटो ओळ : रामानंदनगर (ता. पलूस) येथे आयोजित संमेलनात मार्गदर्शन करताना साहित्यिक विश्वनाथ गायकवाड.