शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सध्या देशात न्याय मागणारा शेतकरीच देशद्रोही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST

सावंतपूर : सध्या देशात सर्वधर्मसमभाव विसरून धर्माच्या राजकारणात हुकूमशाही निर्माण झाल्याने भारतीय राजघटना धोक्यात आली आहे. आज काळ ...

सावंतपूर : सध्या देशात सर्वधर्मसमभाव विसरून धर्माच्या राजकारणात हुकूमशाही निर्माण झाल्याने भारतीय राजघटना धोक्यात आली आहे. आज काळ भयानक आहे. दोन महिने आंदोलन करणारा, न्याय मागणारा शेतकरी देशद्रोही ठरतो आहे, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक विश्वनाथ गायकवाड यांनी व्यक्त केली.

समाजवादी प्रबोधिनी, लोकशाही वाचवा कृतिशील विचारमंच, श्री समर्थ साहित्य कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, पलूस ,व्ही. वाय. पाटील प्रबोधन अकॅडमी यांच्या वतीने रामानंदनगर (ता. पलूस) येथे अठरावे परिवर्तन साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून गायकवाड बोलत होते. या आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक विचारमंचावर आयोजित संमेलनाचे उद्घाटन कथाकार हिंमत पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ विचारवंत व्ही.वाय. पाटील, संमेलनाध्यक्ष विश्वनाथ गायकवाड, स्वागताध्यक्ष संदीप नाझरे, निमंत्रक कवि किरण शिंदे, प्रा. रवींद्र येवले यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनाध्यक्ष गायकवाड म्हणाले, हुकुमशाही सगळ्यात जास्त शब्दांना घाबरते. त्यामुळे या अस्वस्थ वातावरणावर लेखणी पाजळली पाहिजे. शब्दांचे सामर्थ्य सूर्यबिंबासारखे विशाल आहे. या परिस्थितीत भूमिका घेऊन शब्दांचा वापर आज आपण नाही केला तर साहित्यिक म्हणून आपण करंटे ठरू, असे वाटते.

हिंमत पाटील म्हणाले, कवी हा अस्वस्थ वर्तमानाचा भाष्यकार असतो. राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचे गांभीर्य अधिक जिवंत करण्याचे सामर्थ्य कवितेत असते.

कवी सरकार इंगळीकर, रघुराज मेटकरी, रमजान मुल्ला, प्रा. लता ऐवळे-कदम, ऋचा वाघमारे, पतू हेरवाडे, ए.डी. पाटील, चंद्रकांत देशमुखे आदींसह अन्य कवींनी कविता सादर केल्या.

चौकट

इलाही जमादार यांना श्रद्धांजली

या संमेलनात कवी रमजान मुल्ला यांनी,

‘वाचलेली एकलेली माणसे गेली कुठे,

पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे’ ही इलाही जमादार यांची गझल गावून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

फोटो-०१सावंतपूर१

फोटो ओळ : रामानंदनगर (ता. पलूस) येथे आयोजित संमेलनात मार्गदर्शन करताना साहित्यिक विश्वनाथ गायकवाड.