शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

सध्या देशात न्याय मागणारा शेतकरीच देशद्रोही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST

सावंतपूर : सध्या देशात सर्वधर्मसमभाव विसरून धर्माच्या राजकारणात हुकूमशाही निर्माण झाल्याने भारतीय राजघटना धोक्यात आली आहे. आज काळ ...

सावंतपूर : सध्या देशात सर्वधर्मसमभाव विसरून धर्माच्या राजकारणात हुकूमशाही निर्माण झाल्याने भारतीय राजघटना धोक्यात आली आहे. आज काळ भयानक आहे. दोन महिने आंदोलन करणारा, न्याय मागणारा शेतकरी देशद्रोही ठरतो आहे, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक विश्वनाथ गायकवाड यांनी व्यक्त केली.

समाजवादी प्रबोधिनी, लोकशाही वाचवा कृतिशील विचारमंच, श्री समर्थ साहित्य कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, पलूस ,व्ही. वाय. पाटील प्रबोधन अकॅडमी यांच्या वतीने रामानंदनगर (ता. पलूस) येथे अठरावे परिवर्तन साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून गायकवाड बोलत होते. या आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक विचारमंचावर आयोजित संमेलनाचे उद्घाटन कथाकार हिंमत पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ विचारवंत व्ही.वाय. पाटील, संमेलनाध्यक्ष विश्वनाथ गायकवाड, स्वागताध्यक्ष संदीप नाझरे, निमंत्रक कवि किरण शिंदे, प्रा. रवींद्र येवले यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनाध्यक्ष गायकवाड म्हणाले, हुकुमशाही सगळ्यात जास्त शब्दांना घाबरते. त्यामुळे या अस्वस्थ वातावरणावर लेखणी पाजळली पाहिजे. शब्दांचे सामर्थ्य सूर्यबिंबासारखे विशाल आहे. या परिस्थितीत भूमिका घेऊन शब्दांचा वापर आज आपण नाही केला तर साहित्यिक म्हणून आपण करंटे ठरू, असे वाटते.

हिंमत पाटील म्हणाले, कवी हा अस्वस्थ वर्तमानाचा भाष्यकार असतो. राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचे गांभीर्य अधिक जिवंत करण्याचे सामर्थ्य कवितेत असते.

कवी सरकार इंगळीकर, रघुराज मेटकरी, रमजान मुल्ला, प्रा. लता ऐवळे-कदम, ऋचा वाघमारे, पतू हेरवाडे, ए.डी. पाटील, चंद्रकांत देशमुखे आदींसह अन्य कवींनी कविता सादर केल्या.

चौकट

इलाही जमादार यांना श्रद्धांजली

या संमेलनात कवी रमजान मुल्ला यांनी,

‘वाचलेली एकलेली माणसे गेली कुठे,

पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे’ ही इलाही जमादार यांची गझल गावून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

फोटो-०१सावंतपूर१

फोटो ओळ : रामानंदनगर (ता. पलूस) येथे आयोजित संमेलनात मार्गदर्शन करताना साहित्यिक विश्वनाथ गायकवाड.