शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

कुतूहल माझ्या लिखाणाची प्रेरणा

By admin | Updated: November 8, 2015 23:39 IST

अच्युत गोडबोले : विज्ञान-तंत्रज्ञानाइतकेच साहित्य महत्त्वाचे

सांगली : वाचनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ‘का’ हा प्रश्न विचारत गेल्याने आणि त्या विषयात कुतूहल निर्माण करीत गेल्यानेच लिखाण करता आले. लिखाणाचा अनुभव नसतानाही साहित्यात वेगळे स्थान निर्माण करु शकलो, याला माझे विषयातील कुतूहलच कारणीभूत असून, विषयांप्रती कुतूहल ही माझी प्रेरणा असल्याचे प्रतिपादन नामवंत लेखक अच्युत गोडबोले यांनी रविवारी केले. श्रीकांत अभ्यंकर स्मृती व्याख्यानात ‘माझा लेखन प्रवास’ या विषयावर गोडबोले बोलत होते. गोडबोले पुढे म्हणाले, सोलापुरात राहत असताना अनेक महनीय व्यक्ती घरी येत असत. पैशाची नसली तरी, सांस्कृतिक श्रीमंती अधिक असल्यानेच कदाचित लिखाणात ओढला गेलो. बिरजू महाराजांपासून ते भीमसेन जोशींपर्यंत अनेकांचा सहवास लहानपणीच मिळाल्याने नेहमीच संगीत, साहित्य आणि चित्रकलेकडे ओढा होता. मात्र, तरीही गणित विषयातील पहिला क्रमांक कधी सोडला नाही. दहावीला बोर्डात आल्यानंतर आणि त्यानंतर पवईला आयआयटीत प्रवेश घेतल्यानंतरच खऱ्याअर्थाने आपल्यातील मर्यादा कळून आल्या. या मर्यादेतून बाहेर पडण्यासाठी वाचनाकडे ओढा वाढविला. आयआयटीचा विद्यार्थी असलो तरी, आयआयटीचे सोडून सर्व पुस्तके त्यावेळी वाचून झाल्यानेच, प्रत्येक विषयातील ज्ञानाची कक्षा रुंदावण्यास सुरुवात झाली. आपल्या लिखाणाचा प्रवास उलगडताना गोडबोले पुढे म्हणाले, पहिल्यापासूनच कोणत्याही विषयात घुसून त्याचा अभ्यास करण्याची पध्दत आणि वाचन करीत असताना वारंवार पडणाऱ्या ‘का’ या प्रश्नाच्या उत्तरातच माझे लिखाण सामावलेले असते. विज्ञान-तंत्रज्ञानाइतकेच संगीत, साहित्य आणि चित्रकला आवश्यक आहे. आजअखेर मी विद्यार्थी या वृत्तीनेच लिहिल्याने अनेक विषय लिहिता आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी गोडबोले यांच्या सहलेखिका दीपा देशमुख यांनीही, लेखन करीत असताना येणारे अनुभव सांगितले. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, कोटणीस महाराज आदी यावेळी उपस्थित होते. मंदार अभ्यंकर व कुटुंबियांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. (प्रतिनिधी)विषयाच्या प्रेमात पडा...आजचा विद्यार्थी हा केवळ गुणांच्या मागे धावत असल्यानेच, विषयातील त्याची गोडी कमी होत चालली आहे. फक्त गुण मिळविण्यासाठी अभ्यास करण्याऐवजी, त्या विषयावर प्रेम करीत त्याचा अभ्यास केल्यास लिखाणाची उर्मी निर्माण होत असल्याचे गोडबोले यांनी सांगितले.