शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

स्मशानातील औषधांतून गरिबाघरचे उपचार; सांगलीच्या प्रमोद महाजन यांचे १८ वर्षांपासून कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 23:51 IST

सचित लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले की, त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले जातात. त्याचे ज्या खाटावर निधन झाले, तो खाट काढून घेतला जातो. पण त्याची औषधे मात्र स्मशानभूमीत कचरा म्हणून फेकून दिली जातात. हीच औषधे गोळा करून गोरगरिबांच्या उपचारासाठी ती सेवाभावी ट्रस्टला देऊन समाजसेवेचा ...

सचित लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले की, त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले जातात. त्याचे ज्या खाटावर निधन झाले, तो खाट काढून घेतला जातो. पण त्याची औषधे मात्र स्मशानभूमीत कचरा म्हणून फेकून दिली जातात. हीच औषधे गोळा करून गोरगरिबांच्या उपचारासाठी ती सेवाभावी ट्रस्टला देऊन समाजसेवेचा सेतू बांधण्याचे काम ढवळी (ता. वाळवा) येथील प्रमोद महाजन हे करीत आहे. गेल्या १९ वर्षांपासून त्यांचे हे कार्य अखंडितपणे सुरु आहे.स्मशानभूमीतून गोळा केलेल्या या चांगल्या औषधांचा उपयोग गोरगरिबांना व्हावा, या हेतूने ही औषधे कुंभोज (ता. हातकणंगले) येथील जगवल्लभ पार्श्वनाथ सेवा संघाच्या रुग्णालयास ते देत आहेत. वयाची पन्नाशी पार केलेले प्रमोद महाजन यांची घरची परिस्थिती बेताचीच आहे. मुंबईत एसटी बसवर वाहक म्हणून, तसेच सातारा येथे एका कंपनीत सुपरवायझर म्हणून त्यांनी काम केले. पण या दोन्ही नोकरीत मन न रमल्याने त्यांनी गावाकडे येऊन शेती केली. गावातील त्यांचा एक मित्र लष्करात जवान होता. त्याची एक किडनी खराब झाली होती. या मित्रास महाजन यांनी स्वत:ची एक कडनी दान केली. एकदा का दवाखाना मागे लागला, की त्या कुटुंबाचे काय हाल होतात, हे त्यांनी जवळून पाहिले आहे. गोरगरिबांना तर हजार-पाचशे रुपयांची औषधे खरेदी करण्यासही पैसे नसतात. हा विचार करुन त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेऊन गोरगरीब रुग्णांची सेवा सुरु केली.महाजन एक दिवस गावातील एका मृत व्यक्तीच्या रक्षाविसर्जनास गेले होते. तिथे मृतांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात औषधे फेकून दिलेली त्यांना दिसून आली. त्या औषधांची त्यांनी तपासणी केली. त्यावेळी सर्व औषधे चांगली असल्याचे दिसून आले. तेव्हापासून त्यांनी स्मशानभूमीत मृतांची उर्वरित फेकून दिलेली औषधे गोळा करण्याचे कार्य सुरु केले. जी औषधे पॅकबंद आहेत, तीच ते गोळा करतात. पातळ औषधाची बाटली फोडलेली असेल, तर ते त्यामधील औषध फळझाडांना घालतात. पॅकबंद बाटली असेल तरच घेतात.ही सर्व औषधे संकलित करुन ते महिन्यातून एकदा कुंभोजच्या जगवल्लभ पार्श्वनाथ सेवा संघाच्या रुग्णालयास नेऊन दान करतात. महिन्याला १५ ते २० हजाराची औषधे गोळा होतात. महाजन हे गावात ‘दादा’ नावाने प्रसिद्ध आहे.निधनाची पहिली खबर : महाजनांनासध्या गावात कोणाचेही निधन झाले की, ‘दादा कुठे आहे’, असे म्हणून पहिली खबर महाजन यांना दिली जाते. महाजन लगेचच संबंधित मृत व्यक्तीच्या अंत्यविधीच्या कार्यात सहभागी होतात. स्मशानात सरण रचण्यापासून ते मृतदेह पूर्णपणे दहन होईपर्यंत ते तेथे थांबतात. त्यांचे हे कार्य पाहून ग्रामस्थ एखाद्या घरातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर, त्या व्यक्तीची राहिलेली औषधे महाजन यांना घरी बोलावून देत आहेत. पण अजूनही काहीजण स्मशानातच औषधे फेकून देतात. ती गोळा करण्याचे महाजन यांचे कार्य अद्यापही सुरूच आहे. याशिवाय देहदान व अवयव दान चळवळ समाजात रुजविण्यासाठीही ते प्रबोधन करीत आहेत. स्वत: त्यांनी देहदान व अवयव दानाचा संकल्प केला आहे.शेतात मजुरी करून बनविली लोखंडी तिरडीगावात कोणाचे निधन झाले तर तिरडी बांधण्यासाठी बांबू व चिवाट्या मिळत नसत. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत असे. ही बाब लक्षात येताच महाजन व त्यांच्या पत्नीने दुसऱ्याच्या शेतात जाऊन मजुरी केली. त्यातून दीड हजार रुपये मजुरी मिळाली. या रकमेतून महाजन यांनी लोखंडी तिरडी बनवून घेतली व ती ग्रामपंचायतीस दान केली. आजही गावात महाजन यांनी दिलेल्या तिरडीवरूनच मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला जातो.