शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

ग्रामीण भागातच महाराष्ट्राची संस्कृती

By admin | Updated: January 19, 2015 00:22 IST

अशोक नायगावकर : कामेरी येथे वात्सल्य भगिनी व्याख्यानमाला

कामेरी : ग्रामीण भागातच महाराष्ट्राची संस्कृती जोपासली जाते. शहरी भागातील मुलांना एकत्र कुटुंबपध्दतीबाबत विचारले असता, आई-वडील एकत्र राहतात, यालाच एकत्र कुटुंबपध्दती म्हणतात, असे उत्तर त्यांच्याकडून मिळते. हा परिणाम दूरचित्रवाहिन्यांवरील विविध मालिकांमुळे त्यांच्या मनावर बिंबवला गेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी केले.कामेरी (ता. वाळवा) येथील सावित्री महिला मंडळाच्यावतीने आयोजित वात्सल्य भगिनी व्याख्यानमालेत ‘मिष्किली आणि कविता’ या विषयावर ते पहिले पुष्प गुंफताना बोलत होते. सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक प्रकाश पाटील अध्यक्षस्थानी होते. या व्याख्यानमालेचे उद्घाटन उच्चस्तर न्यायाधीश कमलाताई बोरा, माजी आमदार विलासराव शिंदे, प्रकाश पाटील, सौ. छाया पाटील, आष्ट्याच्या नगराध्यक्षा सौ. मंगलादेवी शिंदे यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाले.नायगावकर म्हणाले, कवी हा हळुवार मनाचा असतो, असे म्हटले जाते; पण मी हळू केलेला वार म्हणजे हळुवार असे मानणाऱ्यांपैकी एक आहे. बुध्दीची कामे पुरुषांनी व अंगमेहनतीची कामे स्त्रियांनी करण्याचा नवा पायंडा पडू लागल्याने, आजही स्त्रियांना समाजात मान मिळत नाही आणि भविष्यातही मिळणे अवघड आहे. मानवाच्या दु:खावर अनेकांनी कविता लिहिल्या. पण भाजीपाला, फळे यांच्यावर कविता करणारा एकमेव कवी मी आहे, असे सांगत त्यांनी अनेक किस्से सांगून हा कार्यक्रम मिष्किली आणि हास्य कवितांचा आहे, हे दाखवून दिले. चौपाटीवरील टिळकांच्या पुतळ्याला उद्देशून सादर केलेली कविता व महिलांची ५० वर्षांपूर्वीची आणि आजची स्थिती यातील बदल अधोरेखित करणारी कविता त्यांनी सादर केली. यावेळी सौ. छाया पाटील यांनी प्रास्ताविक केले. सौ. रोझा किणीकर यांनी सूत्रसंचालन केले. कविता माने यांनी आभार मानले. (वार्ताहर)