शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

ग्रामीण भागातच महाराष्ट्राची संस्कृती

By admin | Updated: January 19, 2015 00:22 IST

अशोक नायगावकर : कामेरी येथे वात्सल्य भगिनी व्याख्यानमाला

कामेरी : ग्रामीण भागातच महाराष्ट्राची संस्कृती जोपासली जाते. शहरी भागातील मुलांना एकत्र कुटुंबपध्दतीबाबत विचारले असता, आई-वडील एकत्र राहतात, यालाच एकत्र कुटुंबपध्दती म्हणतात, असे उत्तर त्यांच्याकडून मिळते. हा परिणाम दूरचित्रवाहिन्यांवरील विविध मालिकांमुळे त्यांच्या मनावर बिंबवला गेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी केले.कामेरी (ता. वाळवा) येथील सावित्री महिला मंडळाच्यावतीने आयोजित वात्सल्य भगिनी व्याख्यानमालेत ‘मिष्किली आणि कविता’ या विषयावर ते पहिले पुष्प गुंफताना बोलत होते. सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक प्रकाश पाटील अध्यक्षस्थानी होते. या व्याख्यानमालेचे उद्घाटन उच्चस्तर न्यायाधीश कमलाताई बोरा, माजी आमदार विलासराव शिंदे, प्रकाश पाटील, सौ. छाया पाटील, आष्ट्याच्या नगराध्यक्षा सौ. मंगलादेवी शिंदे यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाले.नायगावकर म्हणाले, कवी हा हळुवार मनाचा असतो, असे म्हटले जाते; पण मी हळू केलेला वार म्हणजे हळुवार असे मानणाऱ्यांपैकी एक आहे. बुध्दीची कामे पुरुषांनी व अंगमेहनतीची कामे स्त्रियांनी करण्याचा नवा पायंडा पडू लागल्याने, आजही स्त्रियांना समाजात मान मिळत नाही आणि भविष्यातही मिळणे अवघड आहे. मानवाच्या दु:खावर अनेकांनी कविता लिहिल्या. पण भाजीपाला, फळे यांच्यावर कविता करणारा एकमेव कवी मी आहे, असे सांगत त्यांनी अनेक किस्से सांगून हा कार्यक्रम मिष्किली आणि हास्य कवितांचा आहे, हे दाखवून दिले. चौपाटीवरील टिळकांच्या पुतळ्याला उद्देशून सादर केलेली कविता व महिलांची ५० वर्षांपूर्वीची आणि आजची स्थिती यातील बदल अधोरेखित करणारी कविता त्यांनी सादर केली. यावेळी सौ. छाया पाटील यांनी प्रास्ताविक केले. सौ. रोझा किणीकर यांनी सूत्रसंचालन केले. कविता माने यांनी आभार मानले. (वार्ताहर)