शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
4
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
5
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
6
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
7
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
8
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
9
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
10
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
11
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
12
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
13
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
14
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
15
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
16
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
17
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
18
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
19
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...

तक्रारदारांच्या उसाला आले तुरे

By admin | Updated: November 26, 2015 00:11 IST

शेतकरी हतबल : कारखान्यांबद्दल नाराजी

अशोक डोंबाळे ल्ल सांगलीशासनाच्या निधीतून शेतकऱ्यांना एफआरपीची सर्व रक्कम देण्याऐवजी, काही कारखान्यांकडून ठेवीच्या नावाखाली प्रति टन १४७ रूपये कपात करून घेतली आहे. या कपातीस काही शेतकऱ्यांनी विरोध केला होता. या शेतकऱ्यांची रक्कम परत केली, पण सध्या या शेतकऱ्यांची साखर कारखानदारांकडून अडवणूक केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी ठेवी कपातीस विरोध केला, त्यांच्या उसाला तुरे आले तरीही, तो तोडून नेण्यास वाळवा तालुक्यातील कारखानदारांनी नकार दिल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या प्रश्नावर शेतकरी संघटनांनी मात्र ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ अशी भूमिका स्वीकारली आहे. पाऊस कमी झाल्यामुळे ऊस वाळू लागला आहे. रासायनिक खते, मजुरीचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. या गोष्टीचा विचार न करता, साखर कारखानदार मात्र साखरेचे दर पडल्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांना एफआरपीपासून वंचित ठेवत आहेत. या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह अन्य संघटनांनीही आवाज उठविल्यामुळे राज्य शासनाने कारखानदारांना एफआरपीची रक्कम देण्यासाठी बिनव्याजी पैसे देण्यास बँकांना हमी दिली. त्यानुसार प्रत्येक साखर कारखान्यास पैसेही वर्ग झाले. पण, साखर कारखान्यांनी आर्थिक अडचणीचे कारण पुढे करून प्रति टनास ऊस उत्पादकांकडून १४७ रूपये ठेवीच्या नावाखाली कपात केली. या कपातीस आष्टा, तुंग, समडोळी, मौजे डिग्रज, कवठेपिरान, दुधगाव, कारंदवाडी येथील काही शेतकऱ्यांनी विरोध केला. एवढेच नव्हे, तर त्यांनी सहमतीपत्रही भरून दिले नाही. या शेतकऱ्यांना साखर कारखानदारांनी पैसे दिले. पण, यावर्षीच्या गळीत हंगामासाठी नोंदणी करूनही संबंधित शेतकऱ्यांचा ऊस गाळपास नेण्यास नकार दिला आहे. याबद्दल शेतकऱ्यांनी संबंधित कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांना विचारले असता, आम्हीच कपातीस विरोध करणाऱ्यांचा ऊस न तोडण्याची सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. साखर कारखानदार प्रशासनाच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी कोंडीत सापडला आहे. उसाला चौदा महिने झाल्यामुळे तुरे आले आहेत. तरीही तो ऊस तोडला जात नाही.‘वसंतदादा’कडून बिलच नाही : सुनील फराटेसर्वोदय साखर कारखान्याकडून ऊस नेला जात नाही म्हणून शेतकरी वसंतदादा साखर कारखान्याकडे ऊस पाठवित आहेत. परंतु, वसंतदादा कारखान्याने या गळीत हंगामामध्ये आतापर्यंत १ लाख ४० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. तरीही मौजे डिग्रज, तुंग भागातील एकाही शेतकऱ्याला दीड महिन्यात बिल मिळालेले नाही. कारखान्याकडे याबाबत चौकशी केली असता, त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही. थोड्याच दिवसात देतो, एवढेच उत्तर मिळत आहे, अशी तक्रार स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केली आहे.शेतकरी झाले हतबल ज्या शेतकऱ्यांनी कपातीस विरोध केला नाही, त्यांचा ऊस तोडून नेला आहे. या भेदभावाबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शेतकरी संघटनाही गप्प असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेवटी शेतकऱ्यांची इच्छा नसताना अन्य कारखान्यांकडे ऊस जात आहे; पण तेथेही पैसे मिळत नसल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.