शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सांगलीच्या बाजारपेठेत गर्दीचा पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्य शासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लाॅकडाऊनची घोषणा केली. या घोषणेनंतर सांगलीच्या मुख्य बाजारपेठेसह मार्केट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राज्य शासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लाॅकडाऊनची घोषणा केली. या घोषणेनंतर सांगलीच्या मुख्य बाजारपेठेसह मार्केट यार्ड, माॅल्स, भाजी मंडईत नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. सलग दुसऱ्या दिवशी नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर उतरले होते. या वेळी कोरोनाचे नियम धाब्यावर बसविण्यात आले. बाजारपेठेत प्रशासनाकडूनही फारशी सक्ती करण्यात आली नव्हती.

गेल्या दोन दिवसांपासून लाॅकडाऊनची चर्चा शहरात सुरू होती. गुढीपाडव्याच्या दिवशी लाॅकडाऊनच्या भीतीने बाजारात गर्दी झाली होती. त्यात राज्य शासनाच्या वतीने मंगळवारी रात्री संचारबंदीची घोषणा केली गेली. त्यामुळे बुधवारी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दीचा पूर आला होता. सकाळी सात वाजल्यापासून नागरिक भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. शिवाजी मंडईत पहाटेपासून विक्रेत्यांनी ठाण मांडले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत मंडईत नागरिकांची गर्दी होती. मारुती रोड, कापडपेठ, हरभट रोडवरील अनेक दुकाने बंद होती. पण, काही दुकानदारांनी अर्धे शटर उघडून व्यवसाय सुरू केला होता. त्यातही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. या दुकानांत किरकोळ खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. रस्त्यावरील फळ विक्रेत्यांकडेही नागरिकांची गर्दी दिसत होती.

मार्केट यार्डातील दुकाने संचारबंदीत सुरू राहणार असली तरी नागरिकांनी लाॅकडाऊनची धास्ती घेतल्याचे दिसून येत होते. मार्केट यार्डात किराणा माल खरेदीसाठी अनेक दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. तीच स्थिती माॅल्समध्येही होती. बाजारपेठा, मार्केट यार्डात कुठेच कोरोना नियमांचे पालन होत नव्हते. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. बाजारपेठेत काही ठिकाणी पोलीस तैनात होते. पण, त्यांच्याकडूनही नियमांच्या पालनाचा आग्रह धरला जात नव्हता.

चौकट

नियमांबाबत संभ्रम

शहरात गुरुवारपासून संचारबंदी लागू केली आहे. पण, त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेसह किराणा दुकाने सुरू राहणार आहेत. भाजीपाला, फळ विक्रेत्यांनी फिरून विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण, संचारबंदी असल्याने घराबाहेर पडता येईल की नाही, या भीतीने नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. कोरोना नियमांबाबत नागरिकांत संभ्रम दिसून येत होता.