शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

सांगलीच्या बाजारपेठेत गर्दीचा पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्य शासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लाॅकडाऊनची घोषणा केली. या घोषणेनंतर सांगलीच्या मुख्य बाजारपेठेसह मार्केट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राज्य शासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लाॅकडाऊनची घोषणा केली. या घोषणेनंतर सांगलीच्या मुख्य बाजारपेठेसह मार्केट यार्ड, माॅल्स, भाजी मंडईत नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. सलग दुसऱ्या दिवशी नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर उतरले होते. या वेळी कोरोनाचे नियम धाब्यावर बसविण्यात आले. बाजारपेठेत प्रशासनाकडूनही फारशी सक्ती करण्यात आली नव्हती.

गेल्या दोन दिवसांपासून लाॅकडाऊनची चर्चा शहरात सुरू होती. गुढीपाडव्याच्या दिवशी लाॅकडाऊनच्या भीतीने बाजारात गर्दी झाली होती. त्यात राज्य शासनाच्या वतीने मंगळवारी रात्री संचारबंदीची घोषणा केली गेली. त्यामुळे बुधवारी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दीचा पूर आला होता. सकाळी सात वाजल्यापासून नागरिक भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. शिवाजी मंडईत पहाटेपासून विक्रेत्यांनी ठाण मांडले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत मंडईत नागरिकांची गर्दी होती. मारुती रोड, कापडपेठ, हरभट रोडवरील अनेक दुकाने बंद होती. पण, काही दुकानदारांनी अर्धे शटर उघडून व्यवसाय सुरू केला होता. त्यातही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. या दुकानांत किरकोळ खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. रस्त्यावरील फळ विक्रेत्यांकडेही नागरिकांची गर्दी दिसत होती.

मार्केट यार्डातील दुकाने संचारबंदीत सुरू राहणार असली तरी नागरिकांनी लाॅकडाऊनची धास्ती घेतल्याचे दिसून येत होते. मार्केट यार्डात किराणा माल खरेदीसाठी अनेक दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. तीच स्थिती माॅल्समध्येही होती. बाजारपेठा, मार्केट यार्डात कुठेच कोरोना नियमांचे पालन होत नव्हते. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. बाजारपेठेत काही ठिकाणी पोलीस तैनात होते. पण, त्यांच्याकडूनही नियमांच्या पालनाचा आग्रह धरला जात नव्हता.

चौकट

नियमांबाबत संभ्रम

शहरात गुरुवारपासून संचारबंदी लागू केली आहे. पण, त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेसह किराणा दुकाने सुरू राहणार आहेत. भाजीपाला, फळ विक्रेत्यांनी फिरून विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण, संचारबंदी असल्याने घराबाहेर पडता येईल की नाही, या भीतीने नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. कोरोना नियमांबाबत नागरिकांत संभ्रम दिसून येत होता.