शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जिल्ह्यातील ६३३ गावांची पीक पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:22 IST

सांगली : खरीप व रब्बी गावांचे वर्गीकरण केल्याप्रमाणे खरीप ६३३ गावांची पीक पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याने शेतकरी शासनाच्या ...

सांगली : खरीप व रब्बी गावांचे वर्गीकरण केल्याप्रमाणे खरीप ६३३ गावांची पीक पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याने शेतकरी शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहाणार आहेत तसेच सध्या तर जिल्हा प्रथमच टँकरमुक्त झाल्याचे दिसत आहे. एप्रिल, मे महिन्यात जत तालुक्यातील काही गावांनाच टंचाईची झळ पोहोचणार आहे.

जिल्ह्यातील एकूण ७३६ गावांपैकी अंतिम पीक पैसेवारी खरीप हंगामातील ६३३ गावांची जिल्हाधिकारी यांनी जाहिर केली आहे. जत तालुक्यातील १२३ गावांपैकी ६९, आटपाडी तालुक्यातील ६० पैकी ३४ अशा १०३ रब्बी गावांची पैसेवारी जाहीर केली नाही. मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, पलूस, कडेगाव, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील शंभर टक्के गावांची पीक पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे गेल्या वीस वर्षांत प्रथमच संपूर्ण जिल्ह्याची पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त लागल्याचे दिसून येत आहे. पीक पैसेवारी जास्त लागल्यामुळे जिल्ह्यात कुठेही पाण्याचा टँकर सुरू करण्यासाठी खूप मोठी कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे. टंचाईच्या उपाययोजनाही राबविता येणार नाहीत. जिल्ह्यात जत, कवठेमहांकाळ तालुक्यातील काही गावांमध्ये सिंचन योजनांचे पाणी गेले नाही. तेथे पाऊसही कमी पडतो, त्याठिकाणी एप्रिल, मे महिन्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

चौकट

यांना मिळतो लाभ

दुष्काळ ठरविण्यासाठी ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या गावांना दुष्काळग्रस्त उपाययोजनांचा लाभ देण्यात येत होता. भरपाईच्या दरात राज्यानेही वाढ केली आहे. कोरडवाहू शेतीसाठी चार हजार ५०० रुपयांवरून सहा हजार ८०० रुपये, बागायतीसाठी ९ हजार रुपयांवरून १३ हजार ५०० रुपये आणि फळबागांसाठी १२ हजार रुपयांवरुन १८ हजार रुपये भरपाई दिली जाते.

चौकट

तालुकानिहाय पैसेवारी

मिरज ७२

तासगाव ६९

क.महांकाळ ६०

जत ५४

खानापूर ६८

आटपाडी २६

पलूस ३५

कडेगाव ५६

वाळवा ९८

शिराळा ९५