शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

सनमडीत कालव्याच्या पाण्याने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST

जत : सनमडी (ता. जत) येथील कालव्याला अचानक पाणी सोडल्याने सुमारे तीनशे ते चारशे एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. ...

जत : सनमडी (ता. जत) येथील कालव्याला अचानक पाणी सोडल्याने सुमारे तीनशे ते चारशे एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. केळी बागा, डाळिंब बागा, ऊस, उडीद, तूर, बाजरी, मूग, भुईमूग, आदी पिकांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

कालव्याची खुदाई व अस्तरीकरण व्यवस्थित न करता ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाणी सोडले होते. मार्च, एप्रिल, मेमध्ये सोडलेल्या पाणी आणि आता पावसाळ्यात सोडलेले पाणी सनमडी, घोलेश्वर, मायथळ येथील पिकात घुसले आहे. उन्हाळ्यात अनेक शेतांची मशागत करता आली नाही, तर ज्या शेतात पेरणी झाली तेथे आता पिकांचे नुकसान होत आहे. आठ महिन्यांपासून शेतकरी या समस्येचा सामना करीत आहेत.

कालव्यासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीचे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. त्यात या पाण्याने नुकसान केले आहे. लवटे वस्ती येथे शेतकऱ्यांनी यापूर्वी काम बंद पडले होते. त्यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार विक्रम सावंत, प्रांताधिकारी प्रशांत आवटी, तत्कालीन तहसीलदार सचिन पाटील, सुनील पवार यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेटी देऊन काम सुरू करण्यास प्रयत्न केले होते.

या पाण्यामुळे दामाजी पवार, जोतिराम पवार, गुलाब पवार, श्यामजी पवार, शिवाजी पवार, जयवंत पवार, रामकृष्ण पवार, बाळू पवार, राजू बंडगर, श्रीशैल हुग्गु, गट्टू हुग्गे, बिरू हुग्गे, सुबराय काळे, मल्हारी काळे, संगांना पुजारी, बाळू नरुटे, बाळासाहेब कर्ले, आदींसह इतर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

चौकट

पंचनामे करण्याची मागणी

प्रांताधिकारी प्रशांत आवटी यांना महिन्याभरपूर्वी लेखी निवेदन दिले होते. तरीही रविवारी रात्री अचानक कालव्याचे पाणी सोडल्याने पिके जमीनदोस्त झाल्या आहेत. या सर्व पिकांचे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. तसेच कालव्याचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पाणी सोडू नये, अशी मागणी शेतकरी दामाजी पवार यांनी केली आहे.

130921\1943-img-20210913-wa0041.jpg

कॅनॉलचे पाणी अचानक सोडल्याने सनमडीतील ४०० एकर जमीन पाण्याखाली