शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

सनमडीत कालव्याच्या पाण्याने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST

जत : सनमडी (ता. जत) येथील कालव्याला अचानक पाणी सोडल्याने सुमारे तीनशे ते चारशे एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. ...

जत : सनमडी (ता. जत) येथील कालव्याला अचानक पाणी सोडल्याने सुमारे तीनशे ते चारशे एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. केळी बागा, डाळिंब बागा, ऊस, उडीद, तूर, बाजरी, मूग, भुईमूग, आदी पिकांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

कालव्याची खुदाई व अस्तरीकरण व्यवस्थित न करता ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाणी सोडले होते. मार्च, एप्रिल, मेमध्ये सोडलेल्या पाणी आणि आता पावसाळ्यात सोडलेले पाणी सनमडी, घोलेश्वर, मायथळ येथील पिकात घुसले आहे. उन्हाळ्यात अनेक शेतांची मशागत करता आली नाही, तर ज्या शेतात पेरणी झाली तेथे आता पिकांचे नुकसान होत आहे. आठ महिन्यांपासून शेतकरी या समस्येचा सामना करीत आहेत.

कालव्यासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीचे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. त्यात या पाण्याने नुकसान केले आहे. लवटे वस्ती येथे शेतकऱ्यांनी यापूर्वी काम बंद पडले होते. त्यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार विक्रम सावंत, प्रांताधिकारी प्रशांत आवटी, तत्कालीन तहसीलदार सचिन पाटील, सुनील पवार यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेटी देऊन काम सुरू करण्यास प्रयत्न केले होते.

या पाण्यामुळे दामाजी पवार, जोतिराम पवार, गुलाब पवार, श्यामजी पवार, शिवाजी पवार, जयवंत पवार, रामकृष्ण पवार, बाळू पवार, राजू बंडगर, श्रीशैल हुग्गु, गट्टू हुग्गे, बिरू हुग्गे, सुबराय काळे, मल्हारी काळे, संगांना पुजारी, बाळू नरुटे, बाळासाहेब कर्ले, आदींसह इतर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

चौकट

पंचनामे करण्याची मागणी

प्रांताधिकारी प्रशांत आवटी यांना महिन्याभरपूर्वी लेखी निवेदन दिले होते. तरीही रविवारी रात्री अचानक कालव्याचे पाणी सोडल्याने पिके जमीनदोस्त झाल्या आहेत. या सर्व पिकांचे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. तसेच कालव्याचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पाणी सोडू नये, अशी मागणी शेतकरी दामाजी पवार यांनी केली आहे.

130921\1943-img-20210913-wa0041.jpg

कॅनॉलचे पाणी अचानक सोडल्याने सनमडीतील ४०० एकर जमीन पाण्याखाली