शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

सरळ मार्गावरील वाकडी चाल ठरतेय घातक<bha>;</bha>

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:38 IST

अविनाश कोळी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महाराष्ट्रात होणाऱ्या एकूण अपघातात तब्बल ७७ टक्के अपघात हे सरळ असलेल्या मार्गावर ...

अविनाश कोळी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महाराष्ट्रात होणाऱ्या एकूण अपघातात तब्बल ७७ टक्के अपघात हे सरळ असलेल्या मार्गावर होत आहेत. सरळ मार्गावर मानवी चुकांची वाकडी चाल ९ हजार ८७१ लोकांच्या जिवावर बेतली, तर यात १४ हजार लोकांना गंभीर स्वरूपाच्या दुखापतीस सामोरे जावे लागले.

राज्यातील तीन वर्षातील आकडेवारीचा विचार करता, कोणतेही अडथळे नसलेल्या सरळ रस्त्यावर सर्वाधिक अपघात झाले आहेत. २०१९ मध्ये २५,३७० अपघात या सरळ मार्गावर घडले. वळणाच्या वाटेवर एकूण ४ हजार २७१ अपघात होऊन त्यात १ हजार ५८५ लोकांचा बळी गेला. पुलांवरील अपघातांचे प्रमाण तुलनेने खूप कमी आहे.

अंधुक प्रकाश, धुके,, पाऊस,, गारपीट यासारख्या नैसर्गिक अडचणींपेक्षा स्वच्छ सूर्यप्रकाशात सर्वाधिक अपघात झाले आहेत. हीसुद्धा धक्कादायक बाब आहे. राज्यात सरळ रस्त्यावर स्वच्छ सूर्यप्रकाश असताना होणाऱ्या अपघातांचे विश्लेषण केल्यानंतर, मानवी चुकांची मोठी यादी समोर येते. २०१९ मध्ये स्वच्छ सूर्यप्रकाशात ९६ टक्के अपघात घडले. यात १२ हजार ७८८ लोकांचा बळी गेला. अन्य नैसर्गिक अडचणींमध्ये ४ टक्के अपघात झाले. त्यामुळे जर वाहनधारकांनी योग्य काळजी घेत वाहतूक नियमांचे पालन केल्यास रस्त्यावरील अपघातांवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळविता येऊ शकते.

चौकट

जोडरस्त्यावरील अपघातांचे प्रमाण

जंक्शन अपघात बळी

टी जंक्शन १६३९ ५७९

वाय जंक्शन ७३५ २४९

चौक ७९७ २२२

गोलाकार रस्ता ४१४ १३२

तिरके चौक ३१४ ९९

चौकट

तीन वर्षातील स्थिती...

वर्ष अपघात बळी गंभीर जखमी

२०१७ ३६०५६ १२५११ २०७६७

२०१८ ३५७१७ १३२६१ २०३३५

२०१९ ३२९२५ १२७८८ १९१५२

चौकट

काय करता येईल

रस्त्यांवर गतिमर्यादा तपासणारी यंत्रणा ठिकठिकाणी बसवावी

हेल्मेट व सिटबेल्टबाबत अधिक काटेकाेर तपासणी व्हावी

नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज

मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांची दररोज तपासणी व्हावी

मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांवर कडक निर्बंध घालावेत