शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

दातृत्वाचा मानदंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:27 IST

सांगली जिल्ह्यात सर्वसामान्यांचा कैवारी व दीनदुबळ्या, गोरगरीब जनतेचा आधार म्हणून वनश्री नानासाहेब महाडिक यांच्याकडे पाहिले जायचे. त्यांच्या स्वभावामुळे दानशूर ...

सांगली जिल्ह्यात सर्वसामान्यांचा कैवारी व दीनदुबळ्या, गोरगरीब जनतेचा आधार म्हणून वनश्री नानासाहेब महाडिक यांच्याकडे पाहिले जायचे. त्यांच्या स्वभावामुळे दानशूर म्हणूनच सर्वसामान्य जनतेच्या मनात स्थान निर्माण केलेल्या नानासाहेब महाडिक या पहाडासारख्या दातृत्वाच्या अचानक जाण्याने सर्वसामान्य मात्र पोरके झाले. त्यांचा आज द्वितीय स्मृतिदिन त्यानिमित्त...

इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक होती. नेहमीप्रमाणे त्याकाळात विरोधी गटात उमेदवारांची वानवा असायची. राहुलदादा महाडिक यांनी मला सांगितले, ‘कपिल, तू लढायचं आहे.’ सकाळी पेठनाक्यावर गेलो. पंपावर नेहमीप्रमाणे नानासाहेब मित्रांत रममाण झाले होते. का आलास म्हणून विचारले. राहुलदादांनी सांगितले, ‘हा आपला गांधी चौकातला उमेदवार आहे.’ नानासाहेबांनी संमती दिली. ‘काळजी करू नकोस, कमी पडू देत नाही’, हा आश्वासक आवाज दिला. माझा विजय झाला. त्यानंतर बरेचजण मला भेटायला येत होते. परंतु हे सर्व घडले, ते नानासाहेबांच्या खंबीर आधारामुळे.

आमचा पिंड राजकीय नाही. परंतु, महाडिक परिवाराचा आदेश शिरसावंद्य मानून वाटचाल करीत असतो. त्यांची छाया आम्हाला पितृतुल्य समान होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. नजरेत विश्वास, धिप्पाड शरीरयष्टी, पांढराशुभ्र पेहराव आणि धाडसी व्यक्तिमत्त्वाचे नानासाहेब सर्वसामान्यांच्या गराड्यात असायचे. छोट्या-छोट्या कामापासून अनेक प्रकारच्या समस्या नानासाहेबांच्या दरबारात येत असायच्या. अनेकांना त्यांनी न्याय दिला. माणसे उभी केली आहेत. फाटक्या, मळक्या कपड्यातील व्यक्तीपासून मध्यम व उच्चवर्गातील व्यक्तीही त्यांच्यासोबत असत. त्यांची पाहुणचाराची ख्याती सर्व परिचित आहे. त्यांच्यातील हा स्वभाव घेण्याचा आमचा अल्पशा प्रयत्न असतो. जोपर्यंत आपल्याकडे जे आहे, त्यातील काही वाटत राहू, तोपर्यंत परमेश्वर काही कमी पडून देत नाही, हा त्यांचा वसा जपला आहे.

त्यांनी उद्योग क्षेत्रातून सामाजिक, राजकीय क्षेत्राला सुरुवात केली. या परिसरात विरोधी गट शाबूत ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. राजकारणात नेहमीच ते संघर्ष करीत राहिले. निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून त्यांना आवश्यक ती मदत करण्यात ते कधीच कमी पडले नाहीत. सामाजिक, राजकीय क्षेत्राबरोबर कुस्ती कलाही जोपासली. त्यांचे सांगली जिल्ह्यासह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मैत्रीपूर्ण संबंध होते.

नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली व्यंकटेश्वरा उद्योग समूहाने आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातही वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामुळे अनेकांना आर्थिक मदत मिळाली. बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. नानासाहेबांच्या अचानक जाण्याने राजकारणाबरोबर सामाजिक क्षेत्रातील न भरून येणारे नुकसान झाले आाहे. त्यांच्या स्मृती चिरंतन आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता त्यांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने पोरकी झाली आहे.

- कपिल ओसवाल, माजी नगरसेवक