शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

दातृत्वाचा मानदंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:27 IST

सांगली जिल्ह्यात सर्वसामान्यांचा कैवारी व दीनदुबळ्या, गोरगरीब जनतेचा आधार म्हणून वनश्री नानासाहेब महाडिक यांच्याकडे पाहिले जायचे. त्यांच्या स्वभावामुळे दानशूर ...

सांगली जिल्ह्यात सर्वसामान्यांचा कैवारी व दीनदुबळ्या, गोरगरीब जनतेचा आधार म्हणून वनश्री नानासाहेब महाडिक यांच्याकडे पाहिले जायचे. त्यांच्या स्वभावामुळे दानशूर म्हणूनच सर्वसामान्य जनतेच्या मनात स्थान निर्माण केलेल्या नानासाहेब महाडिक या पहाडासारख्या दातृत्वाच्या अचानक जाण्याने सर्वसामान्य मात्र पोरके झाले. त्यांचा आज द्वितीय स्मृतिदिन त्यानिमित्त...

इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक होती. नेहमीप्रमाणे त्याकाळात विरोधी गटात उमेदवारांची वानवा असायची. राहुलदादा महाडिक यांनी मला सांगितले, ‘कपिल, तू लढायचं आहे.’ सकाळी पेठनाक्यावर गेलो. पंपावर नेहमीप्रमाणे नानासाहेब मित्रांत रममाण झाले होते. का आलास म्हणून विचारले. राहुलदादांनी सांगितले, ‘हा आपला गांधी चौकातला उमेदवार आहे.’ नानासाहेबांनी संमती दिली. ‘काळजी करू नकोस, कमी पडू देत नाही’, हा आश्वासक आवाज दिला. माझा विजय झाला. त्यानंतर बरेचजण मला भेटायला येत होते. परंतु हे सर्व घडले, ते नानासाहेबांच्या खंबीर आधारामुळे.

आमचा पिंड राजकीय नाही. परंतु, महाडिक परिवाराचा आदेश शिरसावंद्य मानून वाटचाल करीत असतो. त्यांची छाया आम्हाला पितृतुल्य समान होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. नजरेत विश्वास, धिप्पाड शरीरयष्टी, पांढराशुभ्र पेहराव आणि धाडसी व्यक्तिमत्त्वाचे नानासाहेब सर्वसामान्यांच्या गराड्यात असायचे. छोट्या-छोट्या कामापासून अनेक प्रकारच्या समस्या नानासाहेबांच्या दरबारात येत असायच्या. अनेकांना त्यांनी न्याय दिला. माणसे उभी केली आहेत. फाटक्या, मळक्या कपड्यातील व्यक्तीपासून मध्यम व उच्चवर्गातील व्यक्तीही त्यांच्यासोबत असत. त्यांची पाहुणचाराची ख्याती सर्व परिचित आहे. त्यांच्यातील हा स्वभाव घेण्याचा आमचा अल्पशा प्रयत्न असतो. जोपर्यंत आपल्याकडे जे आहे, त्यातील काही वाटत राहू, तोपर्यंत परमेश्वर काही कमी पडून देत नाही, हा त्यांचा वसा जपला आहे.

त्यांनी उद्योग क्षेत्रातून सामाजिक, राजकीय क्षेत्राला सुरुवात केली. या परिसरात विरोधी गट शाबूत ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. राजकारणात नेहमीच ते संघर्ष करीत राहिले. निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून त्यांना आवश्यक ती मदत करण्यात ते कधीच कमी पडले नाहीत. सामाजिक, राजकीय क्षेत्राबरोबर कुस्ती कलाही जोपासली. त्यांचे सांगली जिल्ह्यासह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मैत्रीपूर्ण संबंध होते.

नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली व्यंकटेश्वरा उद्योग समूहाने आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातही वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामुळे अनेकांना आर्थिक मदत मिळाली. बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. नानासाहेबांच्या अचानक जाण्याने राजकारणाबरोबर सामाजिक क्षेत्रातील न भरून येणारे नुकसान झाले आाहे. त्यांच्या स्मृती चिरंतन आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता त्यांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने पोरकी झाली आहे.

- कपिल ओसवाल, माजी नगरसेवक