शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

सरकारच्या कोटा पद्धतीमुळे संकट

By admin | Updated: September 29, 2016 00:00 IST

मानसिंगराव नाईक : विश्वास साखर कारखान्याची वार्षिक सभा

शिराळा : केंद्र-राज्य शासनाने व्यापाऱ्यांबरोबर साटेलोटे केले आहे. यामधून आता साखर साठ्याबाबत ‘कोटा’ पध्दत आली आहे. या पध्दतीमुळे व्यापारी गबर होणार आहेत, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी ऊसदर मिळणार आहे. यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत येणार असल्याचे प्रतिपादन विश्वासराव नाईक साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी बुधवारी केले.भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक लायन्स सभागृहात कारखान्याच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावर्षीही शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा जास्त रक्कम देऊन येणारी दिवाळी गोड करणार असल्याचे यावेळी अध्यक्ष नाईक यांनी सांगितले. यावेळी नाईक म्हणाले की, शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनकडे वळावे, यासाठी कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत. यातून शेतकऱ्यांना कर्ज व अनुदान देण्यात येणार आहे. गतवेळी दुष्काळात अनेक शेतकऱ्यांचा ऊस वाळत होता. तो ऊस अग्रक्रमाने उचलून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टाळले, यामुळे साखर उतारा कमी आला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची साखर उद्योगात मक्तेदारी असल्याचे समजून, केंद्राने साखर उद्योग अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. उत्पादन शुल्क शंभर रुपये तसेच इथेनॉलवर प्रतिलिटर सहा रुपये कर वाढविल्याने ऊसदर कमी मिळणार आहे. या कोटा पध्दतीने साखर मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत आल्याने साखर दर ढासळणार आहेत. साखर दर कमी झाल्यास शेतकऱ्यांना ऊस दर कमी मिळणार आहे. या शासनाच्या निर्णयाविरुध्द साखर कामगार संघाकडून न्यायालयात दाद मागण्यात आली आहे.यावेळी अभिजित नाईक, पी. के. पाटील, मारुती नलवडे, दत्ताजीराव साळुंखे, रामचंद्र पाटील, बाबूराव पाटणकर यांनी ठराव मांडले. संचालक विजयराव नलवडे यांनी प्रास्ताविक केले. सभेत सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. अशोक कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारी संचालक राम पाटील यांनी अहवाल वाचन केले. हंबीरराव पाटील यांनी आभार मानले. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, बँकेचे अध्यक्ष हंबीरराव नाईक, उदयसिंगराव नाईक, रणजितसिंह नाईक, अमरसिंह नाईक, शिवाजीराव पाटील, राजेंद्र नाईक, संजय नाईक, वीरेंद्र नाईक, पंचायत समिती सभापती सम्राटसिंह नाईक, भगतसिंग नाईक, सुरेशराव चव्हाण, युवराज गायकवाड, दिनकर महिंद, भीमराव गायकवाड, विश्वास कदम, संभाजीराव पाटील, डॉ. राजाराम पाटील, तानाजी साळुंखे, डॉ. अरविंद पवार, अभिमन्यू निकम यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)