शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

मनपाची बदनामी करणाऱ्यांवर फौजदारी

By admin | Updated: May 23, 2017 23:23 IST

मनपाची बदनामी करणाऱ्यांवर फौजदारी

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जनतेच्या मागणीनुसार नगरसेवक विकासकामे सुचवित असतात. कोणीतरी तक्रार करते म्हणून प्रशासनाकडून ही कामे रद्द केली जातात. ही कामे तपासून मंजूर करण्याचे काम प्रशासनाचे आहे, पण अधिकाऱ्यांतील दुहीमुळे नगरसेवकांवर घोटाळ्याचे आरोप होऊ लागले आहेत. त्यामुळे महापालिकेची बदनामी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी मंगळवारी महापालिकेच्या महासभेत नगरसेवकांनी केली. नगरसेवकांचा रोख सुधार समितीवर होता. अखेर महापौरांनी फौजदारीचे आदेश प्रशासनाला दिले. महापालिकेची तहकूब झालेली महासभा महापौर हारूण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.सभा सुरू होताच नगरसेवक सुरेश आवटी यांनी बांधकाम विभागाच्या कारभाराचा पंचनामा केला. मिरजेतील पाच कामे रद्द करण्यात आल्याचा जाब त्यांनी विचारला. त्यावर उपायुक्त स्मृती पाटील यांनी, ही कामे रद्द केली नसून स्थगित केल्याचा खुलासा केला. त्यावर नगरसेवक आक्रमक झाले. आवटी म्हणाले की, कामांना विलंब होत असल्याने नगरसेवकांना शिव्या खाव्या लागत आहेत. नगरसेवक काम सुचवत असतो, पुढील प्रक्रिया प्रशासन पार पाडते. अधिकारी वातानुकूलित कार्यालयात बसून काम करतात. कामे बोगस नसल्याचे प्रशासनच कबूल करत आहे. त्यामुळे नाहक बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते म्हणाले की, काही संघटना प्रसारमाध्यमांतून घोटाळ्याचे आरोप करीत आहेत. त्यातून नगरसेवक, पदाधिकारी, अधिकाऱ्यांची बदनामी होत आहे. बोगस आरोप करणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा. विष्णू माने म्हणाले की, निवडणुकांच्या तोंडावर आरोप होऊ लागले आहेत. त्यातून महापालिकेची बदनामी होते. प्रशासन दहावेळा तपासून काम मंजूर करते. मग कोणाच्या तक्रारीची दखल घेण्याची गरजच काय? प्रशांत पाटील म्हणाले की, नागरिकांनी तक्रार केल्यास प्रशासनाने जरूर विचार करावा. परंतु कोणीतरी उठून तक्रार करतो, म्हणून त्याची दखल घेण्याची गरज नाही. त्यांना कामे चूक की बरोबर ठरविण्याचा अधिकार दिला कोणी? प्रशांत मजलेकर म्हणाले की, प्रशासनाच्या चुकांमुळे नगरसेवकांची बदनामी होत आहे. महापौरांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. सांगलीतील रस्त्यांची चर्चा मंत्रालयापर्यंत आहे. संजय मेंढे म्हणाले की, प्रभागातील कमानीचे काम माझे नव्हते, लोकांच्या मागणीनुसार सुचविले होते. अनावश्यक काम असेल तर शहरातील सर्वच कमानी पाडा. गौतम पवार म्हणाले की, नगरसेवकांच्या भावना योग्य असल्या तरी, एखाद्या संघटनेला टार्गेट करणे चुकीचे आहे. यात प्रशासनाच्या त्रुटीमुळे नगरसेवकांना बदनामीस सामोरे जावे लागते. यावर आयुक्त रवींद्र खेबूडकर म्हणाले की, वर्षभरात ९० कोटीची कामे मंजूर केली आहेत. निविदा पूर्ण झालेली कामेही सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या जातील. कोणतीही संघटना, नागरिकांना तक्रारी करण्याचा अधिकार आहे. तक्रारीनंतर त्या कामाची चौकशीही होते. सुधार समितीच्या तक्रारीनंतर शहर अभियंता विजय कांडगावे यांनी खुलासा केला आहे. अधिकाऱ्यांना बरोबर की चूक हे सांगण्याच्या सूचना केल्या आहेत. महापौर शिकलगार म्हणाले की, बांधकाम विभागातील अनागोंदीमुळे नगरसेवकांची बदनामी होत आहे. कामाबाबत शहर अभियंत्यापासून आयुक्तांपर्यंत साऱ्यांच्या सह्या होतात. त्यात नगरसेवक कोठे येतो? तक्रार करणाऱ्यांशी आम्ही कधीही चर्चेला तयार आहोत. चुकीचे काम केल्यास अधिकाऱ्यांना सभेतच निलंबित केले जाईल. मिरजेतील रद्द केलेली पाच कामे तातडीने सुरू करावीत. महापौरांच्या आदेशावर नगरसेवकांचे समाधान झाले नाही. त्यांनी बदनामी करणाऱ्यांवर फौजदारीचे आदेश द्या, असा पवित्रा घेतला. त्यामुळे तसे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.खड्ड्यांचा फलक फडकलानगरसेवक युवराज गायकवाड यांनी आलदर चौक ते स्फूर्ती चौक या रस्त्याच्या दुर्दशेचा डिजिटल फलकच सभागृहात फडकविला. या रस्त्याचे काम कधी होणार? आठवड्यापूर्वी या रस्त्यावरून मुख्यमंत्री गेले. आमदार फंडातून काम मंजूर असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात त्या निधीतूनही काम मंजूर नाही. पालिकेच्या अंदाजपत्रकात बायनेम तरतूद असतानाही रस्त्याचे काम होत नसल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाचा निषेध केला. त्यावर महापौरांनी या रस्त्याचे तातडीने अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले.