शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

निकृष्ट कामास अधिकारी जबाबदार

By admin | Updated: November 20, 2015 00:19 IST

समितीकडून ‘टेंभू’च्या कामाची पाहणी : अर्जुन खोतकरांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर

विटा : टेंभू योजना खानापूर व आटपाडी या दुष्काळी तालुक्यांसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे ही कामे दर्जेदार झाली पाहिजेत. या भागातील दुष्काळ कायमचा संपविण्यासाठी सिंचन योजनांची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे. टेंभूची कामे निकृष्ट केल्यास क्वालिटी कंट्रोलकडून त्याची तपासणी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य शासनाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी दिला.राज्य शासनाच्यावतीने दुष्काळी भागातील जलसिंचन योजनांची पाहणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आमदारांच्या अंदाज समिती पथकाने गुरुवारी खानापूर तालुक्यातील माहुली व साळशिंगे येथील टेंभू योजनेच्या कामाची पाहणी केली. या समितीचे अध्यक्ष आ. अर्जुन खोतकर, आ. धैर्यशील पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. वीरेंद्र जगताप, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. मिलिंद माने, आ. डॉ. शशिकांत खेडेकर, विधान भवनचे सहसचिव अशोक मोहिते, उपसचिव विजय कोमटवार यांच्यासह ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनेचे अधिकारी उपस्थित होते. आ. अनिल बाबर यांनी समितीतील आमदार सदस्यांचे विटा येथे स्वागत केले. समितीतील आमदार सदस्यांनी माहुली येथील टेंभू योजनेचा पंपगृह व साळशिंगे येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. त्यावेळी समितीतील सदस्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना टेंभूसाठी वापरण्यात येत असलेल्या निकृष्ट साहित्यावरून चांगलेच धारेवर धरीत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. समितीचे अध्यक्ष खोतकर, वीरेंद्र जगताप, आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह अन्य सदस्यांनी साळशिंगे व माहुली येथे टेंभूच्या कामासाठी जुने साहित्य कसे वापरता? प्रत्यक्ष कामावरील साहित्याची अवस्था अशी कशी आहे? या कामाची निविदा कधी निघाली आहे? किती किलोमीटरमधील क्षेत्राला टेंभूचा लाभ मिळतो आहे? यासह अन्य प्रश्नांचा भडीमार केल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. प्रश्नांच्या भडीमाराने घामाघूम झालेल्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक उत्तरे देत आपली सुटका करून घेतली.यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सौ. अंजली मरोड, खानापूर पंचायत समिती उपसभापती सुहास बाबर, खानापूर सूतगिरणीचे अध्यक्ष अमोल बाबर, माजी सभापती सुशांत देवकर, दिलीप कीर्दत, शंतनु बाबर, हेमंत बाबर, रामचंद्र भिंगारदेवे, नंदकुमार माने, सरपंच हेमंत सूर्यवंशी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)टेंभू योजनेला शासनाने निधी द्यावा : अनिल बाबरसांगली जिल्ह्यातील एक भाग सधन, तर दुसरा आमचा भाग दुष्काळी आहे. शेतकऱ्यांना फक्त टेंभू योजनेच्या पाण्याचाच आधार आहे; मात्र आमचे तालुके पाण्यापासून वंचित राहिले आहेत. विदर्भ-मराठवाड्याच्या अनुशेषाला आमचा विरोध नाही. आमच्या वंचित राहिलेल्या दुष्काळी तालुक्यातील ‘टेंभू’च्या उर्वरित कामासाठी निधी देण्यास समितीने राज्य शासनाकडे शिफारस करावी, अशी मागणी आमदार अनिल बाबर यांनी केली. पश्चिम महाराष्ट्रातील योजनांना निधी मागू नका : जगतापराज्यात पश्चिम महाराष्ट्राचा सिंंचनात ७० ते ८० टक्के, तर विदर्भ-मराठवाड्याचा केवळ ७ ते ८ टक्केच रेशो आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय नेतेमंडळींमुळेच सांगली जिल्ह्यातील काही तालुके सिंचनापासून वंचित राहिले. हा पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या इच्छाशक्तीचा दोष असून, त्यात आमचा दोष नाही. जलसिंचनात राज्याच्या तुलनेत विदर्भ व मराठवाड्याचा रेशो वाढत नाही व विदर्भ-मराठवाडा सिंचनात सक्षम होत नाही, तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील योजनांसाठी जास्तीचा निधी मागू नये, असे मत अमरावतीचे आ. वीरेंद्र जगताप यांनी यावेळी व्यक्त केले.