शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये गुन्हेगारीतही घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:20 IST

सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये कोरोना संसर्ग तितका कमी आला नसला तरी जिल्ह्यातील गुन्हेगारीचे ...

सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये कोरोना संसर्ग तितका कमी आला नसला तरी जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण मात्र घटले आहे. कडक निर्बंध लागू केल्यापासून पोलिसांनी सुरू केलेल्या कडक कारवाईमुळे फाळकूटदादांची दादागिरी व छोट्या मोठ्या चाेरीच्या घटना घटल्या आहेत. आता निर्बंध शिथिल होणार असून त्यानंतर गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढतच चालल्याने ७ मेपासून जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. या कालावधीतही रुग्णसंख्या कायम असल्याने प्रशासनाने आतापर्यंत चारवेळा लॉकडाऊनमध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत गुन्ह्यांची संख्या मात्र कमालीची घटली आहे.

लाॅकडाऊन अगोदर शहरातील चारही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गर्दी असे. आता हे चित्र दिसत नाही. लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य जनतेला निवांतपणा अनुभवास येत असलातरी पोलिसांच्या कामात मात्र वाढ झाली आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यासह रस्त्यावर उतरून बंदोबस्तासाठी पोलीस तैनात आहेत.

जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्याकडे या महिनाभरात नोंदणी झालेल्या गुन्ह्यांची संख्या तुलनेने कमी आहे. खुनासारख्या घटना कमी झाल्या आहेत. जिल्ह्यात २ घटनांची नोंद झाली आहे. तर या महिन्यात एका घटनेची नोंद आहे. आता कडक निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात येणार असल्याने गुन्ह्यांचा टक्का वाढण्याची शक्यता अधिक आहे.

कोट

लॉकडाऊनमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण कमी जाणवत असलेतरी, पोलीस सदैव कर्तव्यावर होतेच. संचारबंदीची अंमलबजावणी, अवैध मद्यविक्रीसह इतर कारवाई करण्यात आल्या.संपूर्ण लॉकडाऊन कालावधीत नियम मोडणाऱ्यांकडून दंडाचीही वसुली करण्यात आली आहे.

अजित टिके, पाेलीस उपअधीक्षक