शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
3
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
4
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
5
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
6
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
7
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
8
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
9
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
10
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
11
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
12
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
13
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
14
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
15
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
16
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
17
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
18
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
19
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
20
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

वाळेखिंडी सरपंचांसह पाच जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:08 IST

जत : वाळेखिंडी (ता. जत) येथील सरपंच माधवी विजय पाटील (वय ३६) यांच्यासह पाच जणांच्या विरोधात जत पोलिसात ...

जत : वाळेखिंडी (ता. जत) येथील सरपंच माधवी विजय पाटील (वय ३६) यांच्यासह पाच जणांच्या विरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची जाऊबाई सुप्रिया अजय पाटील (वय ३०) यांना मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सुप्रिया पाटील यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही.

सुप्रिया पाटील व अजय तानाजी पाटील ( वय ३५ ) यांचा बारा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना आठ व सहा वर्षांची दोन मुले आहेत. लग्नानंतर पती अजय पाटील, सासरा तानाजी भाऊसाहेब पाटील ( ५५ ), सासू छाया तानाजी पाटील ( ५० ), दीर विजय तानाजी पाटील (४५) व जाऊबाई आणि सरपंच माधवी विजय पाटील यांनी घरगुती कारणावरून सुप्रिया यांना मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले. तसेच माहेरहून दीड लाख रुपये आणण्यासाठी त्रास दिला जात होता.

अजय पाटील व तानाजी पाटील हे हैद्राबाद येथे ज्वेलरी व्यावसायिक म्हणून काम करत आहेत. सुप्रिया या शेतीवाडी व घरदार सांभाळून वाळेखिंडी येथे मुलासमवेत राहात आहेत.

सुप्रिया यांना एकटेच वाळेखिंडी येथे सोडून दोन्ही मुलांना घेऊन अजय पाटील व तानाजी पाटील हैद्राबाद येथे चार दिवसांपूर्वी जात होते. मुलांना घेऊन जाताना सुप्रिया पाटील यांनी विरोध केल्यानंतर त्यांना मारहाण केली. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून सुप्रिया पाटील यांनी पाच जणांविरोधात शनिवारी रात्री उशिरा जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.