शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पूर्व भागातील रस्त्यांवरुन पुन्हा श्रेयवाद उफाळला

By admin | Updated: June 13, 2014 01:28 IST

राष्ट्रवादीचे धरणे : काँग्रेसवर भाजपची टीका

मिरज : मिरज पूर्व भागातील रस्त्यांच्या प्रश्नावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत श्रेयवादाचे राजकारण झाले. काँग्रेसचे उपोषण सुरु असताना आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही धरणे आंदोलन केले. आ. सुरेश खाडे यांनीही मंत्र्यांना भेटून रस्त्यांसाठी निधी मिळविल्याचे जाहीर केले. मिरज-पूर्व भागातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी गेले तीन दिवस उपोषण केले. पालकमंत्री पतंगराव कदम यांना भेटून, रस्त्यांसाठी निधी मिळविण्यासाठी पालकमंत्री पतंगराव कदम यांच्याकडे मुंबईला शिष्टमंडळ गेले होते. रस्त्यासाठी निधीची घोषणा होण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही आज धरणे आंदोलन सुरु केल्याने, काँग्रेस-राष्ट्रवादीतील बेबनाव चव्हाट्यावर आला. रस्त्याच्या प्रश्नाचे श्रेय काँगे्रसला मिळू नये यासाठी राष्ट्रवादीसोबत भाजपचे आमदार सुरेश खाडेही सरसावले. मुंबईत बांधकाममंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन रस्त्यासाठी निधी देण्याची मागणी केली. त्यावर जयंत पाटील यांनी रस्त्याचे काम सुरु करण्याचे आदेश दिल्याचा दावा केला. रस्त्यासाठी आंदोलनाबाबत रिपाइंने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी खा. संजय पाटील व खा. रामदास आठवले यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे रिपाइंचे प्रकाश इनामदार यांनी निवेदनात म्हटले आहे. काँग्रेसच्या आंदोलनावर भाजपने टीका केली. आपल्याच सरकारविरुध्द आंदोलन करण्याची वेळ मिरज तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर आल्याने, सरकार निष्क्रिय असल्याची टीका भाजपने केली. पन्नास वर्षात त्यांना पूर्व भागातील रस्ते करता आले नाहीत. विधानसभेला आ. खाडे यांना टक्कर देणारा उमेदवार त्यांच्याकडे नसल्याने आपल्याच सरकारविरुध्द उपोषण करीत आहेत. काँग्रेसनेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. आपल्याच मुख्यमंत्र्यांची बेअब्रू करीत आहोत, याचे भानही काँग्रेसनेत्यांना नाही, अशी टीका भाजप तालुक ा सरचिटणीस रविकांत साळुंखे यांनी केली. (वार्ताहर)