शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

हिंदू राष्ट निर्मितीसाठी भिडे, एकबोटेंचा वापर मच्छिंद्र सकटे : भाजप, आरएसएसचे तंत्र; कोरेगाव-भीमा दंगल पूर्वनियोजित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:45 IST

सांगली : हिंदू राष्टÑ निर्मितीसाठी भाजप आणि आरएसएसकडून शिवप्रतिष्ठानचे मनोहर (संभाजीराव) भिडे व मिलिंद एकबोटे यांचा वापर करण्याचे नवे तंत्र अवलंबिले

सांगली : हिंदू राष्ट निर्मितीसाठी भाजप आणि आरएसएसकडून शिवप्रतिष्ठानचे मनोहर (संभाजीराव) भिडे व मिलिंद एकबोटे यांचा वापर करण्याचे नवे तंत्र अवलंबिले जात आहे. यापूर्वीच्या दंगलीतही भिडे व एकबोटे यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोप दलित महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. कोरेगाव-भीमा येथील दंगल पूर्वनियोजित होती, असा आरोपही त्यांनी केला.

सकटे म्हणाले की, कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमुळे संपूर्ण महाराष्टÑात चिंतेचे सावट निर्माण झाले होते. यामध्ये एका निष्पाप तरुणाचा बळी गेला. याला जबाबदार कोण? या दंगलीमागे संभाजीराव भिडे, मिलिंद एकबोटे व नाशिकचे घुगे यांचा हात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यानुसार पोलिसांनी भिडेंसह एकबोटेंवर गुन्हा दाखल केला आहे. पण अजूनही त्यांना अटक केली नाही.

या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्टÑ बंद आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसक घटनांप्रकरणी पोलिसांनी संशयितांची धरपकड केली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच कोरेगाव-भीमाची घटना पूर्वनियोजित घडविण्यात आली आहे.

दंगली घडवून निवडणुका जिंकण्याचा भाजपने नवा फंडा सुरु केला आहे. भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवप्रतिष्ठानने सांगलीत मोर्चा काढला. या मोर्चावेळी जिल्हाधिकाºयांनी भिडेंना वाकून नमस्कार केला. जिल्हाधिकाºयांना हे अशोभनीय आहे.

सकटे म्हणाले की, मोदी सरकारने अच्छे दिनचे आमिष दाखवून सत्ता मिळविली; पण अच्छे दिन अजूनही आले नाहीत. दररोज महागाई वाढत आहे. त्यावर कोणीही चर्चा करीत नाही. चर्चा केवळ आरक्षणावरच सुरू आहे. महिलांवर होत असलेल्या अत्याचारावर कोणीही बोलत नाही. देशात प्रत्येक तीन मिनिटाला दलितांवर अत्याचार होत आहे.

लोकभावनेशी खेळ करून सरकारने जनतेची थट्टा चालविली आहे. देशातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सध्या सरकारच्या कामाबद्दल कोणीही समाधानी नाही. या सर्वच बाबींचा जाब सरकारला वेळीच विचारण्याची गरज आहे. यासाठी दलित महासंघाच्यावतीने राज्यभर भारत बचाव परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. त्याची सुरुवात सांगलीतून १३ फेब्रुवारीला विष्णुदास भावे नाट्यमंदिरमध्ये केली जाणार आहे. यासाठी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, प्रवीण गायकवाड, डॉ. भारत पाटणकर, डॉ. बाबूराव गुरव यांना आमंत्रित केले आहे.भिडेंचा कसला त्याग?सकटे म्हणाले की, संभाजीराव भिडे पायात चप्पल घालत नाहीत, पण त्यांच्या डोक्यावर टोपी असते, असे ऐकले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील हेही चप्पल घालत नव्हते, तसेच त्यांच्या डोक्याला टोपीही नसायची. कर्मवीरअण्णांचा हा फार मोठा त्याग होता. तो भिडेंनी पाहावा.