शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

हिंदू राष्ट निर्मितीसाठी भिडे, एकबोटेंचा वापर मच्छिंद्र सकटे : भाजप, आरएसएसचे तंत्र; कोरेगाव-भीमा दंगल पूर्वनियोजित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:45 IST

सांगली : हिंदू राष्टÑ निर्मितीसाठी भाजप आणि आरएसएसकडून शिवप्रतिष्ठानचे मनोहर (संभाजीराव) भिडे व मिलिंद एकबोटे यांचा वापर करण्याचे नवे तंत्र अवलंबिले

सांगली : हिंदू राष्ट निर्मितीसाठी भाजप आणि आरएसएसकडून शिवप्रतिष्ठानचे मनोहर (संभाजीराव) भिडे व मिलिंद एकबोटे यांचा वापर करण्याचे नवे तंत्र अवलंबिले जात आहे. यापूर्वीच्या दंगलीतही भिडे व एकबोटे यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोप दलित महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. कोरेगाव-भीमा येथील दंगल पूर्वनियोजित होती, असा आरोपही त्यांनी केला.

सकटे म्हणाले की, कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमुळे संपूर्ण महाराष्टÑात चिंतेचे सावट निर्माण झाले होते. यामध्ये एका निष्पाप तरुणाचा बळी गेला. याला जबाबदार कोण? या दंगलीमागे संभाजीराव भिडे, मिलिंद एकबोटे व नाशिकचे घुगे यांचा हात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यानुसार पोलिसांनी भिडेंसह एकबोटेंवर गुन्हा दाखल केला आहे. पण अजूनही त्यांना अटक केली नाही.

या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्टÑ बंद आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसक घटनांप्रकरणी पोलिसांनी संशयितांची धरपकड केली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच कोरेगाव-भीमाची घटना पूर्वनियोजित घडविण्यात आली आहे.

दंगली घडवून निवडणुका जिंकण्याचा भाजपने नवा फंडा सुरु केला आहे. भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवप्रतिष्ठानने सांगलीत मोर्चा काढला. या मोर्चावेळी जिल्हाधिकाºयांनी भिडेंना वाकून नमस्कार केला. जिल्हाधिकाºयांना हे अशोभनीय आहे.

सकटे म्हणाले की, मोदी सरकारने अच्छे दिनचे आमिष दाखवून सत्ता मिळविली; पण अच्छे दिन अजूनही आले नाहीत. दररोज महागाई वाढत आहे. त्यावर कोणीही चर्चा करीत नाही. चर्चा केवळ आरक्षणावरच सुरू आहे. महिलांवर होत असलेल्या अत्याचारावर कोणीही बोलत नाही. देशात प्रत्येक तीन मिनिटाला दलितांवर अत्याचार होत आहे.

लोकभावनेशी खेळ करून सरकारने जनतेची थट्टा चालविली आहे. देशातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सध्या सरकारच्या कामाबद्दल कोणीही समाधानी नाही. या सर्वच बाबींचा जाब सरकारला वेळीच विचारण्याची गरज आहे. यासाठी दलित महासंघाच्यावतीने राज्यभर भारत बचाव परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. त्याची सुरुवात सांगलीतून १३ फेब्रुवारीला विष्णुदास भावे नाट्यमंदिरमध्ये केली जाणार आहे. यासाठी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, प्रवीण गायकवाड, डॉ. भारत पाटणकर, डॉ. बाबूराव गुरव यांना आमंत्रित केले आहे.भिडेंचा कसला त्याग?सकटे म्हणाले की, संभाजीराव भिडे पायात चप्पल घालत नाहीत, पण त्यांच्या डोक्यावर टोपी असते, असे ऐकले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील हेही चप्पल घालत नव्हते, तसेच त्यांच्या डोक्याला टोपीही नसायची. कर्मवीरअण्णांचा हा फार मोठा त्याग होता. तो भिडेंनी पाहावा.