शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
3
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
4
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
6
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
7
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
8
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
9
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
10
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
12
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
13
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
14
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
15
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
16
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
17
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
18
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
19
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
20
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ

वास्तवातून सृजनशील साहित्याची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:18 IST

भिलवडी : वाचकाला अंतर्मुख व अस्वस्थ करणारे साहित्य सर्वाधिक गुणात्मक असते. विचारांचा वसा घेऊन व्रतस्थपणे वास्तवाला भिडल्याशिवाय सृजनशील साहित्याची ...

भिलवडी : वाचकाला अंतर्मुख व अस्वस्थ करणारे साहित्य सर्वाधिक गुणात्मक असते. विचारांचा वसा घेऊन व्रतस्थपणे वास्तवाला भिडल्याशिवाय सृजनशील साहित्याची निर्मिती होत नाही,, असे प्रतिपादन साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन यांनी केले.

भिलवडी (ता. पलूस) येथे सुभाष कवडे लिखित ‘जांभळमाया’ या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले. उद्योगपती गिरीश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली होते. वैजनाथ महाजन व प्रा. प्रदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. वैजनाथ महाजन म्हणाले की, मराठी साहित्यात शिक्षक साहित्यिकांनी लेखनाची मोठी परंपरा निर्माण केली. सुभाष कवडे हे साहित्य क्षेत्रातील आनंदयात्री आहेत. ते समाजासाठी जे स्वीकार्य आहे तेच सकारात्मकरीत्या मांडतात. त्यांचे पुस्तक प्रकाशित होणं हा आत्मिक आनंदाचा भाग आहे. उद्योजक गिरीष चितळे म्हणाले की, ‘जांभळमाया’ हे पुस्तक आत्मिक समाधानाबरोबर अनुभव विश्व ही जागृत करते.

सुभाष कवडे यांच्या संघर्षाचे सार म्हणजे जांभळमाया, असे प्रतिपादन कवी प्रदीप पाटील यांनी केले.

अमरसिंह देशमुख यांनी माणदेशातील तत्कालीन परिस्थितीचे व संघर्षाचे चित्रण लेखणात उतरल्याचे नमूद केले, त्याचसोबत "व्यक्त व्हा व अधिकाधिक लिहते व्हा" असा संदेश त्यांनी आपल्या भाषणात दिला.

विठ्ठल मोहिते यांनी प्रास्ताविक व स्वागत, शरद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. डी. आर. कदम यांनी आभार मानले. यावेळी प्रा. संजय ठिगळे, शाहीर पाटील, जी. जी. पाटील, ए. के. चौगुले, भू. ना. मगदूम, रमेश पाटील, पुरुषोत्तम जोशी, महावीर वठारे, हणमंत डिसले आदी उपस्थित होते.

फोटो-३१भिलवडी१

फोटो ओळ - भिलवडी (ता. पलुस) येथे ‘जांभळमाया’ या पुस्तकाचे प्रकाशन गिरीश चितळे, अमरसिंह देशमुख, प्रा. वैजनाथ महाजन, प्रा. प्रदीप पाटील, सुभाष कवडे यांच्या हस्ते करण्यात आले.