शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

वास्तवातून सृजनशील साहित्याची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:18 IST

भिलवडी : वाचकाला अंतर्मुख व अस्वस्थ करणारे साहित्य सर्वाधिक गुणात्मक असते. विचारांचा वसा घेऊन व्रतस्थपणे वास्तवाला भिडल्याशिवाय सृजनशील साहित्याची ...

भिलवडी : वाचकाला अंतर्मुख व अस्वस्थ करणारे साहित्य सर्वाधिक गुणात्मक असते. विचारांचा वसा घेऊन व्रतस्थपणे वास्तवाला भिडल्याशिवाय सृजनशील साहित्याची निर्मिती होत नाही,, असे प्रतिपादन साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन यांनी केले.

भिलवडी (ता. पलूस) येथे सुभाष कवडे लिखित ‘जांभळमाया’ या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले. उद्योगपती गिरीश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली होते. वैजनाथ महाजन व प्रा. प्रदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. वैजनाथ महाजन म्हणाले की, मराठी साहित्यात शिक्षक साहित्यिकांनी लेखनाची मोठी परंपरा निर्माण केली. सुभाष कवडे हे साहित्य क्षेत्रातील आनंदयात्री आहेत. ते समाजासाठी जे स्वीकार्य आहे तेच सकारात्मकरीत्या मांडतात. त्यांचे पुस्तक प्रकाशित होणं हा आत्मिक आनंदाचा भाग आहे. उद्योजक गिरीष चितळे म्हणाले की, ‘जांभळमाया’ हे पुस्तक आत्मिक समाधानाबरोबर अनुभव विश्व ही जागृत करते.

सुभाष कवडे यांच्या संघर्षाचे सार म्हणजे जांभळमाया, असे प्रतिपादन कवी प्रदीप पाटील यांनी केले.

अमरसिंह देशमुख यांनी माणदेशातील तत्कालीन परिस्थितीचे व संघर्षाचे चित्रण लेखणात उतरल्याचे नमूद केले, त्याचसोबत "व्यक्त व्हा व अधिकाधिक लिहते व्हा" असा संदेश त्यांनी आपल्या भाषणात दिला.

विठ्ठल मोहिते यांनी प्रास्ताविक व स्वागत, शरद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. डी. आर. कदम यांनी आभार मानले. यावेळी प्रा. संजय ठिगळे, शाहीर पाटील, जी. जी. पाटील, ए. के. चौगुले, भू. ना. मगदूम, रमेश पाटील, पुरुषोत्तम जोशी, महावीर वठारे, हणमंत डिसले आदी उपस्थित होते.

फोटो-३१भिलवडी१

फोटो ओळ - भिलवडी (ता. पलुस) येथे ‘जांभळमाया’ या पुस्तकाचे प्रकाशन गिरीश चितळे, अमरसिंह देशमुख, प्रा. वैजनाथ महाजन, प्रा. प्रदीप पाटील, सुभाष कवडे यांच्या हस्ते करण्यात आले.