शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरातून पानसरेंसाठी अडीचशेवर वकिलांची फौज

By admin | Updated: September 28, 2015 23:45 IST

धनाजी गुरव : सत्तरजणांच्या स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती

इस्लामपूर : कोल्हापूर येथील ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पानसरे कुटुंबियांतर्फे न्यायालयात बाजू मांडण्यासाठी इस्लामपुरातील २७0 वकिलांची फौज तयार झाल्याची माहिती विद्रोही चळवळीचे कार्याध्यक्ष कॉ. धनाजी गुरव यांनी पत्रकार बैठकीत दिली. आतापर्यंत ७0 वकिलांनी वकीलपत्रावर स्वाक्षरी केली असून मंगळवारी उर्वरित २00 वकील स्वाक्षरी करणार आहेत.गुरव म्हणाले की, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या सनातन संस्थेच्या समीर गाकवाड या संशयित आरोपीसाठी ३0 वकिलांनी बाहेरुन येऊन आव्हान दिले आहे. त्यामुळे विद्रोही चळवळीने कॉ. पानसरे यांच्या कुटुंबियांच्यावतीने बहुजन समाजातील जास्तीत जास्त वकिलांनी या खटल्यात योगदान द्यावे, असे आवाहन केले होते. त्याला येथील इस्लामपूर वकील संघटनेने प्रतिसाद दिला. अध्यक्ष अ‍ॅड. अर्जुन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे. अ‍ॅड. एस. यु. संदे म्हणाले की, कॉ. पानसरे यांच्या हत्येचा तपास प्राथमिक टप्प्यात आहे. त्यातच संशयित समीर गायकवाड यास निर्दोष ठरविण्याचे प्रयत्न त्याच्या वकिलांकडून केले गेले. कॉ. पानसरे यांनी आपले आयुष्य चळवळीला दिले आहे. त्यामुळे त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या बाजूने लढू.‘अंनिस’चे एल. डी. पाटील म्हणाले की, कॉ. पानसरेंच्या हत्येत केवळ समीर—रुद्रपर्यंतची यंत्रणा नाही. यामध्ये मोठी साखळी आणि षड्यंत्र आहे. यावेळी दीपक कोठावळे, दिग्विजय पाटील, अ‍ॅड. ए. एल. मोहिते उपस्थित होते. (वार्ताहर)त्यांची जागा दाखवू!गुरव म्हणाले की, न्यायाची गरज म्हणून संशयित गायकवाडसाठी युक्तिवाद करणे मान्य, पण न्यायालयाबाहेर येऊन प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्या वकिलांनी विचारांची मर्यादा सोडून बेताल आणि समाजात भीती पसरविणारी विधाने केली. त्यांच्या वक्तव्यातून न्याय व्यवस्थेलाच बटिक बनविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले. यापुढील काळात सनातनी वृत्ती हस्तक्षेप करतील, तर राज्यातील बहुजन समाज त्यांना त्यांची जागा दाखवेल.