शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

वर्षाला एक कोटी खर्च, तरीही शहर अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:24 IST

शीतल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेकडून साहित्याचा पुर‌वठा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वर्षाला ...

शीतल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेकडून साहित्याचा पुर‌वठा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वर्षाला एक कोटी रुपयांचा खर्च करूनही साहित्याअभावी शहरातील अनेक भाग अंधारात आहेत. अगदी सणासुदीला नागरिकांच्या नशिबी अंधारच आला होता.

राज्य शासनाने एलईडी पथदिवे बसविण्याबाबत मध्यंतरी आदेश काढला होता. त्याचा ठेकाही एका कंपनीला दिला होता. याच कंपनीकडून एलईडी दिवे बसविण्याची शिफारसही केली होती. पण महापालिकेने हा निर्णय मान्य केला नाही. त्यामुळे सध्या खराब झालेले पथदिवे बंदच पडले आहेत. गेल्या दोन वर्षापासून हा विषय गाजतो आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील नगरसेवकांनीही सभागृहात त्यावर आवाज उठविला आहे. पण अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही.

महापालिकेला ट्युब, चोक, बल्ब आदी खरेदीची मुभा आहे. त्यासाठी वर्षाला एक कोटी रुपयांचा खर्च केला जातो. पण हे साहित्य कधी विद्युत विभागाकडे येते आणि त्याचे वाटप कधी होते, हेच आजअखेर समजलेले नाही. नगरसेवकांनी मागणी केल्यानंतर साहित्याचा पुरवठा झाला नसल्याचे कारण दिले जात आहे. यंदाही महापालिकेने चार प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रातील पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी २५ लाख याप्रमाणे एक कोटी रुपयांच्या निविदा काढल्या. पण आजअखेर साहित्य काही मिळालेले नाही. एका प्रभागात काम सुरू झाल्याचे सांगण्यात येते. शासन व महापालिकेच्या गोंधळामुळे शहरातील अनेक भाग अंधारात आहेत. चोऱ्या, मारामाऱीच्या घटना वाढल्या आहेत. नागरिकांनीही त्यावर आंदोलन केले, पण झोपेेचे सोंग घेतलेल्या विद्युत विभागाला त्याच्याशी काहीच देणेघेणे नसल्याचे दिसून येते.

चौकट

माहितीची लपवाछपवी

गेल्या दोन ते तीन वर्षात विद्युत विभागाकडे किती साहित्य आले, ते कोणाला दिले, ट्युब, बल्ब व इतर साहित्य कुठे बसविले याची माहिती मागविली होती. पण आजअखेर विद्युत विभागाकडून त्यावर कसलेच उत्तर देण्यात आलेले नाही. निव्वळ लपवाछपवी सुरू आहे. विद्युत साहित्याची मागणी केली, पण पुरवठा नसल्याचे कारण दिले जाते. याविरोधात सभागृहात आवाज उठविणार असल्याचे नगरसेवक मनोज सरगर यांनी सांगितले.

चौकट

महापालिका क्षेत्रातील पथदिवे : ३० हजार

बंद असलेले पथदिवे : ३ हजारहून अधिक