शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने मृत्यूंमध्ये ७५ टक्के रुग्णांना पूर्वीपासूनच आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:19 IST

सांगली : कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्याही स्थिर होत आहे. अद्याप रुग्णसंख्या हजारावर स्थिर असलेतरी ...

सांगली : कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्याही स्थिर होत आहे. अद्याप रुग्णसंख्या हजारावर स्थिर असलेतरी ऑक्सिजन बेडची उपलब्धता आणि पॉझिटिव्हिटी रेटही कमी हाेत असल्याने दिलासा मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही अगोदरच आजार असलेले रुग्णांचेच मृत्यूचे प्रमाण अधिक असून, त्यात ४० ते ७० वयोगटातील व्यक्तींचे सर्वाधिक प्रमाण आहे.

शासनाच्या निर्देशानुसार जानेवारीपासून नवीन आकडेवारीस सुरुवात झाली आहे. याच कालावधीत रुग्णसंख्या वाढत चालल्याने दुसरी लाट गृहीत धरली जाते त्यात सहव्याधी असलेले रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. यातही अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग असलेल्या बाधितांचे प्रमाण अधिक होते.

सहा महिन्यांतील मृत्यूमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत तरुणांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. लवकर उपचार न घेता घरातच थांबून राहिल्यानेही अनेकांचे मृत्यू ओढवले आहेत. दुसऱ्या लाटेत गुरुवारअखेर एकूण २०६३ जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यात चाळीस वर्षांपासून पुढील व्यक्तींच्याच मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार दर महिन्याला डेथ ऑडिट केले जाते. त्यात मृत्यूची संख्या, मृत्यूचेे नेमके कारण, त्यातील कोणत्या आजाराने अगोदरच व्यक्ती बाधित होती याचीही आकडेवारी केली जाते. त्यामुळे सहव्याधी असलेले व्यक्तींच्याच मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चौकट

उपचारास विलंबाने ओढवले मृत्यू

कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच यावेळीही लवकर निदान व त्यानंतर तातडीने उपचार घेण्यास झालेली हयगय अनेकांच्या जीवावर बेतली आहे. लवकर निदान झाले असते तर उपचार सुरू करण्यास अडचणी नव्हत्या. मात्र, अनेकांनी स्थानिक डॉक्टरांनाच दाखवून घरातच थांबण्यास प्राधान्य दिले व प्रकृती अधिकच बिघडल्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू केल्याने मृत्यूचे प्रमाण आहे.

चौकट

सर्वात जास्त मधुमेहीच

* कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बळी गेलेल्या रुग्णांमध्ये ६० टक्के जणांना अगोदरच मधुमेहासह इतर आजारांचे निदान झाले होते.

* यातही मधुमेही रुग्णांचेच प्रमाण सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. मधुमेहाची औषधे व इन्सुलीन घेणाऱ्यांचे प्रमाण होते.

* मधुमेहानंतर उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण होते. त्यांचेही प्रमाण अधिक प्रमाणात असल्याचे ऑडिटमधून समोर आले.

चौकट

‘मला काय होतंय’मुळे अनेकजण मृत्यूच्या दारात

पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत तुलनेने तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यात कोरोनाची लक्षणे असतानाही हा साधा ताप असल्याचे व मला कोराेना होणारच नाही या मानसिकतेमधील वयाने तरुण रुग्णांची प्रकृती गंभीर बनली आणि त्यातील अनेकांचे मृत्यू ओढवले.

चौकट

बेडसाठी वणवण नाही

गेल्यावर्षी जिल्ह्यात उपचारासाठी बेड मिळविताना रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होत होती. दुसऱ्या लाटेत मात्र, रुग्णांची संख्या २३०० वर गेली असतानाही रुग्णांना ऑक्सिजन व नियमित बेड्स मिळत होते. आता अनेक रुग्णालयातील बेड रिकामे पडले आहेत.

चौकट

वयोगटानुसार मृत्यू

० ते ९ ०

१० ते १९ १

२० ते २९ ३३

३० ते ३९ १४०

४० ते ४९ २५२

५० ते ५९ ४१४

६० ते ६९ ५७८

७० ते ७९ ४४२

८० ते ८९ १८२

९० आणि पुढील २१