शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

पंढरीची वारी झाल्यास जगातील कोरोना नामशेष होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:20 IST

सांगली : सध्या देशातच नव्हे तर जगभरात कोरोनामुळे संकट निर्माण झाले आहे. संपूर्ण देश कोरोनामुक्त होण्यासाठी संतांच्या परंपरा जपल्याने ...

सांगली : सध्या देशातच नव्हे तर जगभरात कोरोनामुळे संकट निर्माण झाले आहे. संपूर्ण देश कोरोनामुक्त होण्यासाठी संतांच्या परंपरा जपल्याने आपल्या जगावर आलेली विघ्ने नाहीशी होतात. त्यामुळेच पायी वारी झाल्यास केवळ देशातील नव्हे तर जगातील कोरोना नामशेष होईल, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी बुधवारी सांगलीत केले.

पंढरपूरच्या पायी वारीला परवानगी देण्यात यावी या मागणीचे निवेदन भिडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

भिडे म्हणाले, आपला संपूर्ण देश कोरोनामुक्त व्हावा असेच प्रत्येकाला वाटत आहे आणि लवकरच देश कोरोनामुक्त होणारही आहे. त्यामुळे वारीला परवानगी दिल्यास संत परंपरा जपली जाणार आहे. आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर अशा पायी वाऱ्या करणारे लाखो वारकरी आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे वारीची परंपरा खंडित झाली असतानाही वारकरी उत्सुक आहेत. राज्यात सर्वत्र राजकीय कार्यक्रम सुरू आहेत, शिवाय काही जिल्हे वगळता कोरोनास्थितीही नियंत्रणात आली आहे. त्यामुळे नियमांचे पालन करत वारकऱ्यांना वारीसाठी परवानगी द्यावी. शासनाने सुरुवातीला पायी वारीस परवानगी दिली होती. मात्र, नंतर केवळ बसने जाण्यास परवानगी दिली. हा वारकऱ्यांचा झालेला विश्वासघात असून, बंडातात्या कराडकर यांनी शासनाचा विरोध झुगारून पायीच वारी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शासकीय नियमांचे पालन करून वारीसाठी परवानगी देण्यात यावी.

यावेळी वारकरी संप्रदायाचे लक्ष्मण नवलाई, बाळासाहेब काकडे, विश्वासराव गवळी, हणमंत पवार, अंकुश जाधव, संताजी काळे, राहुल बोळाज, सचिन पवार, अनिल तानवडे आदी उपस्थित होते.