शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

जिल्ह्यात ४५ वर्षांवरील १४.५० लाख लाभार्थींना एप्रिलपासून कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:25 IST

सांगली : जिल्ह्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाची लस उपलब्ध होणार असून, एकूण साडेचौदा लाख लाभार्थी आहेत. त्यासाठी ...

सांगली : जिल्ह्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाची लस उपलब्ध होणार असून, एकूण साडेचौदा लाख लाभार्थी आहेत. त्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून, अधिकाधिक लसीकरणाचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची दररोज वाढणारी संख्या पाहता, ४५ वर्षांवरील सर्वांना लस देणे फायद्याचे ठरेल, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. सध्या ६० वर्षांवरील सर्वांना व ४५ ते ५९ दरम्यानच्या व्याधीग्रस्तांना लस टोचली जात आहे. सुरुवातीला लसीकरणाला प्रतिसाद नव्हता, पण गेल्या पंधरवड्यापासून लस घेण्यासाठी गर्दी होत असून, एक लाखाहून अधिक नागरिकांनी लस घेतली आहे. शासकीय व खासगी ११० केंद्रात लस टोचण्याची सोय उपलब्ध केली आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होईल, तेव्हा गर्दी वाढण्याची शक्यता आहे. तरीही सध्याची केंद्रे पुरेशी ठरतील, असे डॉ. साळुंखे म्हणाले.

४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाविषयी शासनाकडून अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत, मात्र सध्याच्या पद्धतीनुसारच ती टोचली जाणार आहे. नागरिकांना कोविन ॲपवर नोंदणी करावी लागेल, त्यावरून मिळालेल्या वेळेत जवळच्या आरोग्य केंद्रात लस घेता येईल. थेट केंद्रात जाऊन आधार कार्डद्वारे नोंदणीचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. गर्दी नसलेल्या ठिकाणी त्याचदिवशी लस टोचून घेणे शक्य आहे.

लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी सांगितले की, लोकसंख्येच्या सुमारे ४० ते ४५ टक्के लोक ४५ वर्षांवरील वयाचे आहेत. त्यानुसार साडेचौदा लाख लोकांना लस टोचावी लागणार आहे. आतापर्यंत दीड लाख लसींचे डोस मिळाले आहेत. मागणी वाढेल त्यानुसार आणखी लस येईल.

चौकट

अगोदरच सुरू झाले लसीकरण

सध्या ६० वर्षांवरील सर्वांना व ४५ ते ५९ वर्षांदरम्यानच्या व्याधीग्रस्तांना लस मिळते. पण काही ठिकाणी व्याधी नसतानाही ४५ ते ५९ दरम्यानच्या नागरिकांनी लस घेतल्याचे आढळले आहे. आरोग्याधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. डॉक्टरांवर दबाव टाकून, वशिलेबाजीने किंवा व्याधीची खोटी प्रमाणपत्रे दाखवून त्यांनी लस घेतली आहे.

पॉईंटर्स

- ४५ वर्षांवरील लोकसंख्या - सुमारे १४ लाख ५० हजार

- आतापर्यंत झालेले एकूण लसीकरण - १ लाख १२ हजार ९३७

- साठ वर्षांवरील लस घेतलेले लाभार्थी - ६३ हजार ४२१

- ४५ ते ५९ वर्षांचे लस घेतलेले व्याधीग्रस्त - १४ हजार १२४

- जिल्ह्याला आतापर्यंत मिळालेले डोस - १ लाख ५० हजार

- लसीकरण सुरू असणारी केंद्रे - ११०

कोट

१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी सध्याची केंद्र संख्या पुरेशी ठरेल. आधारकार्डद्वारे लाभार्थ्यांची नोंदणी करून लस टोचली जाईल. लसीकरणाविषयी शासनाकडून नेमके मार्गदर्शन अद्याप मिळालेले नाही, पण अधिकाधिक लाभार्थ्यांना लस टोण्याचे उद्दिष्ट आहे.

- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक