शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने महिलांपुढे निर्माण केले न सुटणारे प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:21 IST

सांगली : जिल्हा प्रशासनाने कोविड काळात सुरु केलेल्या विश्वास हेल्पलाईनवर महिन्याभरात ९ हजार ५३७ जणांनी मदतीसाठी फोन केले. कोरोनामुळे ...

सांगली : जिल्हा प्रशासनाने कोविड काळात सुरु केलेल्या विश्वास हेल्पलाईनवर महिन्याभरात ९ हजार ५३७ जणांनी मदतीसाठी फोन केले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व मानसिक कोंडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.

जिल्हा प्रशासनाने इस्लामपुरातील शुश्रूषा संस्थेच्या मदतीने विश्वास हेल्पलाईन सुरु केली आहे. कोरोना व लॉकडाऊनमध्ये नागरिकांचे मानसिक समुपदेशन त्याद्वारे केले जाते. गेल्या काही महिन्यात हेल्पलाईन अखंड खणखणते आहे. कुटुंबातील सदस्यांचे मृत्यू, दुरावलेला शेजार यामुळे महिलांचे फोन विशेषत्वाने सुरु झाल्याची माहिती समुपदेशक कालिदास पाटील यांनी दिली. शासनाच्या मनोमित्र उपक्रमाद्वारे महिलांशी हितगुज केले जात आहे. पतीचे अकस्मात निधन, आई- वडिलांच्या जाण्याने आलेला पोरकेपणा, कर्जाचा वाढता डोंगर, मुलींचे वाढते वय आणि लग्नाचे प्रश्न अशा अनेक अडचणींना कोरोना काळात तोंड द्यावे लागत आहे. विश्वास हेल्पलाईनकडे आलेल्या कॉलपैकी ६० टक्के महिलांचे आहेत. मुलांना कोरोनाचा धोका, त्यांच्या शिक्षण व नोकरीचे प्रश्न याची चिंता त्या व्यक्त करत आहेत. स्नेहा कुलकर्णी, कविता पवार, डॉ. वर्षा सावंत, मेधा शिंदे, लता कांकरिया, धनश्री पुजारी असे मानसतज्ज्ञ त्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याचे काम करत आहेत. समुपदेशनासाठी १८००१०२४७१० किंवा ९४२२६२७५७१ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.

चौकट

कोरोनाने निर्माण केले न सुटणारे प्रश्न

पाठीशी ठामपणे उभे राहणारे सासू सासरे अचानक कोरोनाने हिरावले. आई- वडिलांचा मृत्यू झाल्याने माहेरपण संपले, मुले मामा -मावशीच्या गावाला पारखी झाली, मन मोकळे करायला हक्काची जागा उरली नाही अशा अनेक प्रश्नांनी महिला त्रस्त झाल्या आहेत. कोरोनाने त्यांच्यापुढे न सुटणारे प्रश्न निर्माण केले आहेत. याची दखल विश्वास हेल्पलाईनवर घेतली जात आहे.