शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

कोरोनाने महिलांपुढे निर्माण केले न सुटणारे प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:21 IST

सांगली : जिल्हा प्रशासनाने कोविड काळात सुरु केलेल्या विश्वास हेल्पलाईनवर महिन्याभरात ९ हजार ५३७ जणांनी मदतीसाठी फोन केले. कोरोनामुळे ...

सांगली : जिल्हा प्रशासनाने कोविड काळात सुरु केलेल्या विश्वास हेल्पलाईनवर महिन्याभरात ९ हजार ५३७ जणांनी मदतीसाठी फोन केले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व मानसिक कोंडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.

जिल्हा प्रशासनाने इस्लामपुरातील शुश्रूषा संस्थेच्या मदतीने विश्वास हेल्पलाईन सुरु केली आहे. कोरोना व लॉकडाऊनमध्ये नागरिकांचे मानसिक समुपदेशन त्याद्वारे केले जाते. गेल्या काही महिन्यात हेल्पलाईन अखंड खणखणते आहे. कुटुंबातील सदस्यांचे मृत्यू, दुरावलेला शेजार यामुळे महिलांचे फोन विशेषत्वाने सुरु झाल्याची माहिती समुपदेशक कालिदास पाटील यांनी दिली. शासनाच्या मनोमित्र उपक्रमाद्वारे महिलांशी हितगुज केले जात आहे. पतीचे अकस्मात निधन, आई- वडिलांच्या जाण्याने आलेला पोरकेपणा, कर्जाचा वाढता डोंगर, मुलींचे वाढते वय आणि लग्नाचे प्रश्न अशा अनेक अडचणींना कोरोना काळात तोंड द्यावे लागत आहे. विश्वास हेल्पलाईनकडे आलेल्या कॉलपैकी ६० टक्के महिलांचे आहेत. मुलांना कोरोनाचा धोका, त्यांच्या शिक्षण व नोकरीचे प्रश्न याची चिंता त्या व्यक्त करत आहेत. स्नेहा कुलकर्णी, कविता पवार, डॉ. वर्षा सावंत, मेधा शिंदे, लता कांकरिया, धनश्री पुजारी असे मानसतज्ज्ञ त्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याचे काम करत आहेत. समुपदेशनासाठी १८००१०२४७१० किंवा ९४२२६२७५७१ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.

चौकट

कोरोनाने निर्माण केले न सुटणारे प्रश्न

पाठीशी ठामपणे उभे राहणारे सासू सासरे अचानक कोरोनाने हिरावले. आई- वडिलांचा मृत्यू झाल्याने माहेरपण संपले, मुले मामा -मावशीच्या गावाला पारखी झाली, मन मोकळे करायला हक्काची जागा उरली नाही अशा अनेक प्रश्नांनी महिला त्रस्त झाल्या आहेत. कोरोनाने त्यांच्यापुढे न सुटणारे प्रश्न निर्माण केले आहेत. याची दखल विश्वास हेल्पलाईनवर घेतली जात आहे.