शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी ओलांडला हजाराचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:27 IST

सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मंगळवारी दुसऱ्या लाटेतील सर्वोच्च रुग्णसंख्येची नोंद झाली असून, दिवसभरात १०९० रुग्ण आढळून ...

सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मंगळवारी दुसऱ्या लाटेतील सर्वोच्च रुग्णसंख्येची नोंद झाली असून, दिवसभरात १०९० रुग्ण आढळून आले, तर कोरोनाने १९ जणांचा बळी घेतला. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक २०३, तर आटपाडी, मिरज आणि जत तालुक्यात शंभरहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दिवसभरात ३६७ जणांनी कोरोनावर मात केली.

जिल्ह्यात आतापर्यंत ६३ हजार १७७ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ५२ हजार ८७७ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या ८३३१ सक्रिय रुग्ण आहेत. मंगळवारी महापालिका क्षेत्रात २०३ रुग्ण आढळून आले. त्यात सांगलीतील १३५, तर मिरजेतील ६८ रुग्णांचा समावेश आहे. कडेगाव तालुक्यात ८०, वाळवा ९७, जत १०२, खानापूर ९२, तासगाव तालुक्यात ९८, आटपाडीत १०५, पलूस ५६, कवठेमहांकाळ ५९, मिरज १४५, शिराळा तालुक्यात ५३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. कोल्हापूर १९, सोलापूर ८, सातारा ७, मुंबई २, रत्नागिरी ३, बुलडाणा १ व कर्नाटकातील ३ असे परजिल्ह्यातील ४३ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत, तर कऱ्हाड येथील एक व सोलापूर येथील तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दिवसभरात कडेगाव, पलूसमधील प्रत्येकी एक, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळमधील प्रत्येकी तीन, मिरज व वाळवा तालुक्यातील प्रत्येकी दोन, तर महापालिका क्षेत्रातील ४ अशा १९ जणांचा मृत्यू झाला, तर ३६७ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या १५१२ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील १२६४ जण ऑक्सिजनवर, १६१ जण नाॅन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर, ७५ जण हाय फ्लो नेेझल ऑक्सिजनवर, तर १२ जण इन्व्हेजीव व्हेंटिलेंटरवर आहेत.

चौकट

आतापर्यंतचे बाधित : ६३१७७

कोरोनामुक्त झालेले : ५२८७७

उपचाराखालील रुग्ण : ८३३१

आतापर्यंतचे मृत्यू : १९६९

चौकट

मंगळवारी दिवसभरात...

सांगली : १३५

मिरज : ६८

आटपाडी : १०५

कडेगाव : ८०

खानापूर : ९२

पलूस : ५६

तासगाव : ९८

जत : १०२

कवठेमहांकाळ : ५९

मिरज : १४५

शिराळा : ५३

वाळवा : ९७