शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

कोरोना रुग्णसंख्या घटली; वाढते मृत्युसत्र कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:19 IST

सांगली : आठवडाभरापासून स्थिर असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी घट झाली. दिवसभरात ८७७ नवे रुग्ण आढळून आले, तर ५८७ जण ...

सांगली : आठवडाभरापासून स्थिर असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी घट झाली. दिवसभरात ८७७ नवे रुग्ण आढळून आले, तर ५८७ जण कोरोनामुक्त झाले. मृत्युसत्र कायम असून, जिल्ह्यातील २५ जणांचा कोरोनाने तर दोघांचा म्युकरमायकोसिसने मृत्यू झाला.

जिल्ह्यातील २५ जणांचा मृत्यू झाला त्यात सांगली १, वाळवा ८, शिराळा ४, जत, कवठेमहांकाळ, पलूस आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी २, आटपाडी, कडेगाव, खानापूर, तासगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

आराेग्य यंत्रणेने आरटीपीसीआरअंतर्गत २,५७४ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ३६६ जण पॉझिटिव्ह आढळले, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ७१५२ जणांच्या नमुना तपासणीतून ५२६ जणांना कोरोनाचे निदान झाले.

उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येत वाढ होत सध्या ९ हजार ३१६ जण उपचार घेत आहेत त्यात १११३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ९०१ जण ऑक्सिजनवर, तर २१२ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील १५ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले.

चौकट

म्युकरमायकोसिसचा नवीन एकही रुग्ण गुरुवारी आढळला नाही. मात्र, उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १,३३,९५३

उपचार घेत असलेले ९,३१६

कोरोनामुक्त झालेले १,२०,८१६

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३,८२१

पॉझिटिव्हिटी रेट ९.१८ टक्के

गुरुवारी दिवसभरात

सांगली ९८

मिरज २४

आटपाडी ४२

कडेगाव ६२

खानापूर ६५

पलूस ७२

तासगाव ११४

जत ५५

कवठेमहांकाळ ३१

मिरज तालुका ९०

शिराळा ४३

वाळवा १८१