शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

कोरोनामुळे ६६६ बालकांनी एक पालक गमावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:32 IST

सांगली : कोरोनामुळे जिल्हाभरात ६६६ बालकांनी एक पालक गमावला आहे. १८ बालके अनाथ झाली आहेत. त्यांना शासकीय योजनांचा जास्तीत ...

सांगली : कोरोनामुळे जिल्हाभरात ६६६ बालकांनी एक पालक गमावला आहे. १८ बालके अनाथ झाली आहेत. त्यांना शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केली.

या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी स्थापन केलेल्या कृती दलाच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. विश्वास माने, महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा पवार, महापालिका उपायुक्त राहुल रोकडे, जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण अधिकारी संदीप यादव, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सुचेता मलवाडे, बाल संरक्षण अधिकारी बाबासाहेब नागरगोजे यांच्यासह कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, या सर्व अनाथ बालकांच्या शैक्षणिक शुल्कासाठी मदत मिळवून द्यावी. अनाथ प्रमाणपत्रासाठी कार्यवाही करावी. कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना समाज कल्याण, महिला आर्थिक विकास महामंडळ, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत शासकीय योजनांचा लाभ द्यावा.

सुवर्णा पवार यांनी सांगितले की, कोरोनामुळे १८ बालक अनाथ झाले आहेत. ६६६ बालकांनी एक पालक गमावला आहे. यापैकी ६५१ बालकांचे सामाजिक तपासणी अहवाल पूर्ण झाले आहेत. ५७२ बालकांसाठी बाल संगोपन योजनेचे आदेश दिले आहेत. १२ अनाथांचे संयुक्त बँक खाते उघडले आहे.