शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

जिल्ह्यात ९४५ जणांना कोरोना; २५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST

सांगली : जिल्ह्यातील नव्या कोरोनारुग्णांची स्थिर संख्या रविवारीही कायम होती. दिवसभरात ९४५ जण आढळून येतानाच जिल्ह्यातील २५ जणांचा मृत्यू ...

सांगली : जिल्ह्यातील नव्या कोरोनारुग्णांची स्थिर संख्या रविवारीही कायम होती. दिवसभरात ९४५ जण आढळून येतानाच जिल्ह्यातील २५ जणांचा मृत्यू झाला. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत १११९ जण कोरोनामुक्त झाले.

कोरोनाने मृत्यूसंख्येत रविवारी वाढ होत २५ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली २, कुपवाड १, वाळवा ७, मिरज तालुका ४, तासगाव ३, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ प्रत्येकी २, कडेगाव आणि जत तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

शनिवारी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दहा हजारावर गेली होती. त्यात रविवारी काहीशी घट झाली. सध्या ९ हजार ८११ जण उपचार घेत असून त्यातील ९८३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ८२८ जण ऑक्सिजनवर तर १५५ जण व्हेंटीलेटरवर उपचार घेत आहेत.

आरोग्य विभागाने चाचण्यांचे वाढविलेले प्रमाण रविवारीही कायम ठेवले होते. दिवसभरात आरटीपीसीआर अंतर्गत ३३०४ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ४०४ जण बाधित आढळले तर रॅपिड ॲंटिजनच्या ९४२१ जणांच्या नमुने चाचणीतून ५६२ पॉझिटिव्ह आढळले. परजिल्ह्यातील नवे २१ रुग्ण उपचारास दाखल झाले.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १५६९९८

उपचार घेत असलेले ९८११

कोरोनामुक्त झालेले १४२९१२

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४२७५

पॉझिटिव्हीटी रेट ७.५९

रविवारी दिवसभरात

सांगली ९८

मिरज २८

आटपाडी ५३

कडेगाव १०८

खानापूर ९९

पलूस ८६

तासगाव ५८

जत ५३

कवठेमहांकाळ ७७

मिरज तालुका ९१

शिराळा ६०

वाळवा १३४

चौकट

आठ हजारांवर रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

जिल्ह्यातील रुग्णसंख्या व उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. पंधरवड्यापूर्वी सहा हजारांवर रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत होते. त्यात वाढ होत आता ८ हजार १३३ जण होम आयसोलेशनमध्य उपचार घेत आहेत.