शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

जिल्ह्यात ८०१ जणांना कोरोना; २४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत साेमवारी पुन्हा वाढ झाली. दिवसभरात ८०१ जणांना कोरोनाचे निदान झाले तर परजिल्ह्यातील तिघांसह जिल्ह्यातील ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत साेमवारी पुन्हा वाढ झाली. दिवसभरात ८०१ जणांना कोरोनाचे निदान झाले तर परजिल्ह्यातील तिघांसह जिल्ह्यातील २१ अशा २४ जणांचा मृत्यू झाला. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढतच असून ९५२ जण कोरोनामुक्त झाले. पंधरवड्यात प्रथमच म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण न आढळल्याने दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील २१ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली, मिरज प्रत्येकी २, वाळवा ४, मिरज तालुक्यात ३, खानापूर, तासगाव प्रत्येकी २, आटपाडी, जत, शिराळा आणि पलूस तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

सोमवारी आरटीपीसीआर अंतर्गत २४०४ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ३०० जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ७१५१ जणांच्या तपासणीतून ५१४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

उपचार घेत असलेल्या ८४३७ रुग्णांपैकी १०१० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ८६५ जण ऑक्सिजनवर तर १४५ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू तर १३ नवे रुग्ण उपचारास दाखल झाले आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १३६९५९

उपचार घेत असलेले ८४३७

कोरोनामुक्त झालेले १२४६१३

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३९०९

पॉझिटिव्हीटी रेट ८.५२

सोमवारी दिवसभरात

सांगली ४४

मिरज १६

आटपाडी १६

कडेगाव ५५

खानापूर ४५

पलूस ८५

तासगाव ४४

जत ३१

कवठेमहांकाळ ३६

मिरज तालुका १११

शिराळा ६३

वाळवा २३५