सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी ३५ ने वाढ झाली. बाधितांची संख्या मर्यादीत राहतानाच मृत्यूच्या संख्येतही घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू, तर २४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
गेल्या चार दिवसांपासून मृत्यूंची संख्या ४ वर होती. त्यात शनिवारी घट झाली आहे. शिवाय शिराळा आणि पलूस तालुक्यात एकाही नव्या बाधिताची नोंद झालेली नाही.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी मिरज व जत तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्हयातील कोरोनाबळींची संख्या १७२२ वर पोहोचली आहे.
आरोग्य विभागाच्यावतीने शनिवारी आरटीपीसीआरअंतर्गत ५२८ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या १२०९ चाचण्यांमधून १९ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
उपचार घेत असलेल्या ३८५ रुग्णांपैकी ६८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ६० जण ऑक्सिजनवर, तर ८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. सोलापूर जिल्हयातील एकास कोरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७२३२
उपचार घेत असलेले ३८५
कोरोनामुक्त झालेले ४५१२५
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७२२
शनिवारी दिवसभरात
सांगली ११
मिरज १
खानापूर ११
जत ४
आटपाडी, तासगाव प्रत्येकी २
कवठेमहांकाळ, मिरज, वाळवा, कडेगाव प्रत्येकी १