शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

दोन दिवसांत २६६५ जणांना कोरोना; १०२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:22 IST

आठवड्यापासून जिल्ह्यात सरासरी तेराशेच्यावर रुग्णांना कोरोनाचे निदान होत आहे. रविवारी दिवसभरात जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. यात ...

आठवड्यापासून जिल्ह्यात सरासरी तेराशेच्यावर रुग्णांना कोरोनाचे निदान होत आहे. रविवारी दिवसभरात जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. यात वाळवा तालुक्यात सर्वाधिक ९, तर मिरज आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी ७, खानापूर ६, कवठेमहांकाळ ४, पलूस, जत प्रत्येकी ३, तासगाव, शिराळा, आटपाडी प्रत्येकी २, तर कडेगाव तालुक्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी ३६ जणांचा मृत्यू झाला. त्यात महापालिका क्षेत्र, वाळवा आणि खानापूर तालुक्यांतील प्रत्येकी ५, जत, तासगाव प्रत्येकी ४, मिरज तालुका ६, कवठेमहांकाळ ३, शिराळा २, तर कडेगाव आणि पलूस तालुक्यांतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

रविवारी आरोग्य विभागाच्या वतीने आरटीपीसीआर अंतर्गत २३६९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ८४४ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर रॅपिड अँँटिजेनच्या २२०७ जणांच्या तपासणीतून ५४७ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १३ हजार ५९५ झाली असून, त्यातील २३३३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २१०२ जण ऑक्सिजनवर, तर २३१ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. रविवारी परजिल्ह्यातील ८ जणांचा मृत्यू झाला असून, दिवसभरात ५३ जण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ७८३४३

उपचार घेत असलेले १३५९५

कोरोनामुक्त झालेले ६२४००

आतापर्यंतचे एकूण मृत्यू २३४८

रविवारी दिवसभरात

सांगली १६७

मिरज ११९

मिरज तालुका २००

आटपाडी १६८

खानापूर १६२

वाळवा १३८

कवठेमहांकाळ ९५

जत ८७

तासगाव ७१

पलूस ५६

कडेगाव ४३

शिराळा ३२