शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

जिल्ह्यात १६०१ जणांना कोरोना; ६२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:26 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी पुन्हा वाढ झाली. दिवसभरात १६०१ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर परजिल्ह्यातील १३ तर ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी पुन्हा वाढ झाली. दिवसभरात १६०१ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर परजिल्ह्यातील १३ तर जिल्ह्यातील ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. १,५७३ जण कोरोनामुक्त झाले असले, तरी वाढती मृत्यूची संख्या चिंता वाढविणारी आहे. जत तालुक्यात सर्वाधिक २७३ रुग्ण सापडले आहेत.

शनिवारी जिल्ह्यातील सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली. त्यात महापालिका क्षेत्रातील ९ जणांचा समावेश आहे. यात सांगली ६, मिरज २, कुपवाड एक तर वाळवा, खानापूर तालुक्यात प्रत्येकी ७, जत, तासगाव तालुक्यात प्रत्येकी ५, आटपाडी, कडेगाव तालुक्यात प्रत्येकी ४, शिराळा, मिरज तालुक्यात प्रत्येकी ३ तर कवठेमहांकाळ तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य यंत्रणेच्या वतीने शनिवारी ६,४४३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात आरटीपीसीआरअंतर्गत २,३३४ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली त्यात ७४२ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर रॅपिड अँटिजनच्या ४,१०९ नमुन्यांच्या तपासणीतून ९५१ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जिल्ह्यातील १६ हजार ९८५ जण उपचारासाठी दाखल असून, त्यातील २,५५३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २,२२१ जण ऑक्सिजनवर तर ४१ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

परजिल्ह्यातील १३ जणांचा मृत्यू झाला असून, नवे ९२ जण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

चाैकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ९९,३०६

उपचार घेत असलेले १६,९८५

कोरोनामुक्त झालेले ७९,४४२

आतापर्यंतचे एकूण मृत्यू २,८७९

शनिवारी दिवसभरात

सांगली ९२

मिरज ५२

जत २७३

मिरज तालुका १९०

खानापूर १६८

कडेगाव १३६

आटपाडी १२७

शिराळा १२६

तासगाव ११०

पलूस ९९

कवठेमहांकाळ ५२