सांगली : जिल्ह्यात शुक्रवारी नवीन कोरोना रुग्णसंख्या स्थिर राहताना, नवीन १११ रुग्ण आढळले. १२ जणांचा मृत्यू झाला, तर दिवसभरात १४३ जण कोरोनामुक्त झाले.
नवीन रुग्णसंख्या घटली असली तरी मृत्यूसंख्या अद्यापही कायम आहे. शुक्रवारी १२ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली १, मिरज तालुक्यातील ३, तासगाव, वाळवा तालुक्यातील प्रत्येकी २, आटपाडी, खानापूर, जत, कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाने दिवसभरात आरटीपीसीआरअंतर्गत २२६० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ५७ जण, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ३६६६ जणांच्या नमुने तपासणीतून ५६ जण पॉझिटिव्ह आढळले.
उपचार घेत असलेल्या ८८७ जणांपैकी ३१३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २४४ जण ऑक्सिजनवर, तर ६९ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील दोघे उपचारास दाखल झाले.
चाैकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १९७६५९
उपचार घेत असलेले ८८७
कोराेनामुक्त झालेले १९१५२०
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५२५२