शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ उपकेंद्रासाठी सांगली, मिरज, कवलापूरमधील जागा सोयीच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:17 IST

संतोष भिसे लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र हा राजकीय संघर्षाचा किंवा एखाद्या तालुक्याच्या विकासाला चालना देणारा ...

संतोष भिसे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र हा राजकीय संघर्षाचा किंवा एखाद्या तालुक्याच्या विकासाला चालना देणारा विषय नाही. त्यामध्ये विद्यार्थ्यांची सोय महत्त्वाची आहे. त्यामुळे उपकेंद्रासाठी सांगली परिसरच सर्वांगीणदृष्ट्या योग्य असल्याची भूमिका विविध स्तरातून व्यक्त होत आहे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आदी क्षेत्रांतील जाणकारांच्या भूमिका ‘लोकमत’ने जाणून घेतल्या असता, सांगली-मिरजेला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले.

उपकेंद्र सांगली शहरात होणेच योग्य आहे. जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था सांगली, मिरज व परिसरात आहेत. उपकेंद्र कोठेेतरी आडवळणी गावात नेल्यास विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होईल. उपकेंद्र हा राजकीय विषय नसून, त्याकडे शैक्षणिक व प्रशासकीय सोयीच्यादृष्टीने पाहिले गेले पाहिजे.

- प्रा. डॉ. भास्कर ताम्हणकर, प्राचार्य, विलिंग्डन महाविद्यालय

उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, गतिमान इंटरनेट सुविधा, जिल्हाभरातून दळणवळण आदी सुविधा फक्त महापालिका क्षेत्रातच मिळू शकतात. सांगली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे, त्यामुळे उपकेंद्र सांगलीतच होणे योग्य ठरेल. त्यासाठी महापालिका सर्वतोपरी सहकार्य करेल.

- दिग्विजय सूर्यवंशी, महापौर

सोयी-सुविधांच्यादृष्टीने उपकेंद्रासाठी सांगली मध्यवर्ती ठिकाण ठरेल. जिल्ह्यातील बहुतांश महत्त्वाची महाविद्यालये सांगली-मिरजेत आहेत, विद्यार्थीसंख्याही जास्त आहे, त्यामुळे उपकेंद्र सांगलीतच व्हायला हवे.

- सुधीर गाडगीळ, आमदार

उपकेंद्र सांगली-मिरजेजवळ होणे सर्वांसाठी सोयीचे आहे. जत किंवा शिराळ्याचा विद्यार्थी खानापूर किंवा बस्तवडेला जायचा झाला तर त्याचा अर्धाअधिक दिवस प्रवासातच जाईल. त्यामुळे उपकेंद्र हा राजकीय विषय न करता योग्य निर्णय झाला पाहिजे. ते सांगलीत होण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरुन लढा देऊ.

- पृथ्वीराज पाटील, शहर-जिल्हाध्यक्ष, काॅंग्रेस

विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी सांगली परिसरात जागा उपलब्ध आहेत. मिरजेत शासकीय दूध योजनेची १०० एकरहून अधिक जागा सध्या पडून आहे. रेल्वे आणि बससेवेमुळे मिरजेचा जिल्हाभराशी संपर्क आहे, त्यामुळे उपकेंद्र महापालिका क्षेत्रात, किंबहुना मिरजेत झाल्यास सर्वांच्या सोयीचे होणार आहे.

- मकरंद देशपांडे, भाजप नेते

खुद्द विद्यापीठानेही सांगली शहर व परिसरालाच पसंती दिली आहे. उपकेंद्र इतरत्र झाल्यास प्रशासन पूर्णवेळ देऊ शकणार नाही. जिल्ह्यातील १३०पैकी ९०हून अधिक महाविद्यालये सांगलीजवळ आहेत, त्यामुळे उपकेंद्र महापालिका हद्दीतच हवे. शिवाय कवलापूर विमानतळाची जागाही सोयीची ठरेल. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनीही ताकद लावली पाहिजे.

- ॲड. अमित शिंदे, निमंत्रक, विद्यापीठ उपकेंद्र कृती समिती

उपकेंद्र समितीने बस्तवडे येथील जागा डोंगराळ असल्याने यापूर्वीच नाकारली आहे. खानापूरच्या जागेसाठीही जिल्हा प्रशासनाने फारसा प्रतिसाद दिलेला नाही. विद्यापीठाने व जिल्हा प्रशासनाने यातून तोडगा काढावा. सर्वांची सोय होईल, अशी जागा निवडून उपकेंद्राचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा. आपसातील संघर्षामुळे उपकेंद्र लांबणीवर पडेल, असे होऊ नये.

- उमेश देशमुख, सरचिटणीस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी

जिल्ह्यातील ६० टक्के महाविद्यालये आणि किमान चार तालुक्यांसाठी वाहतूक व इतर साधन-सुविधांच्यादृष्टीने कवलापूर येथील जागा सोयीची आहे. येथील सुमारे १६७ एकर जागा सध्या औद्योगिक महामंडळाच्या ताब्यात आहे. ती उपकेंद्रासाठी पुरेशी ठरेल. सांगली, कवलापूर परिसरातील शैक्षणिक संस्था तसेच नजिकच्या शहरांतील महाविद्यालयांसाठी ती जागा मध्यवर्ती आहे. त्यासाठी लढा उभा करायला हवा.

- अनिल डुबल, नवभारत मंडळ, बुधगाव

(समाप्त)