शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

विद्यापीठ उपकेंद्रासाठी सांगली, मिरज, कवलापूरमधील जागा सोयीच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:17 IST

संतोष भिसे लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र हा राजकीय संघर्षाचा किंवा एखाद्या तालुक्याच्या विकासाला चालना देणारा ...

संतोष भिसे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र हा राजकीय संघर्षाचा किंवा एखाद्या तालुक्याच्या विकासाला चालना देणारा विषय नाही. त्यामध्ये विद्यार्थ्यांची सोय महत्त्वाची आहे. त्यामुळे उपकेंद्रासाठी सांगली परिसरच सर्वांगीणदृष्ट्या योग्य असल्याची भूमिका विविध स्तरातून व्यक्त होत आहे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आदी क्षेत्रांतील जाणकारांच्या भूमिका ‘लोकमत’ने जाणून घेतल्या असता, सांगली-मिरजेला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले.

उपकेंद्र सांगली शहरात होणेच योग्य आहे. जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था सांगली, मिरज व परिसरात आहेत. उपकेंद्र कोठेेतरी आडवळणी गावात नेल्यास विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होईल. उपकेंद्र हा राजकीय विषय नसून, त्याकडे शैक्षणिक व प्रशासकीय सोयीच्यादृष्टीने पाहिले गेले पाहिजे.

- प्रा. डॉ. भास्कर ताम्हणकर, प्राचार्य, विलिंग्डन महाविद्यालय

उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, गतिमान इंटरनेट सुविधा, जिल्हाभरातून दळणवळण आदी सुविधा फक्त महापालिका क्षेत्रातच मिळू शकतात. सांगली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे, त्यामुळे उपकेंद्र सांगलीतच होणे योग्य ठरेल. त्यासाठी महापालिका सर्वतोपरी सहकार्य करेल.

- दिग्विजय सूर्यवंशी, महापौर

सोयी-सुविधांच्यादृष्टीने उपकेंद्रासाठी सांगली मध्यवर्ती ठिकाण ठरेल. जिल्ह्यातील बहुतांश महत्त्वाची महाविद्यालये सांगली-मिरजेत आहेत, विद्यार्थीसंख्याही जास्त आहे, त्यामुळे उपकेंद्र सांगलीतच व्हायला हवे.

- सुधीर गाडगीळ, आमदार

उपकेंद्र सांगली-मिरजेजवळ होणे सर्वांसाठी सोयीचे आहे. जत किंवा शिराळ्याचा विद्यार्थी खानापूर किंवा बस्तवडेला जायचा झाला तर त्याचा अर्धाअधिक दिवस प्रवासातच जाईल. त्यामुळे उपकेंद्र हा राजकीय विषय न करता योग्य निर्णय झाला पाहिजे. ते सांगलीत होण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरुन लढा देऊ.

- पृथ्वीराज पाटील, शहर-जिल्हाध्यक्ष, काॅंग्रेस

विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी सांगली परिसरात जागा उपलब्ध आहेत. मिरजेत शासकीय दूध योजनेची १०० एकरहून अधिक जागा सध्या पडून आहे. रेल्वे आणि बससेवेमुळे मिरजेचा जिल्हाभराशी संपर्क आहे, त्यामुळे उपकेंद्र महापालिका क्षेत्रात, किंबहुना मिरजेत झाल्यास सर्वांच्या सोयीचे होणार आहे.

- मकरंद देशपांडे, भाजप नेते

खुद्द विद्यापीठानेही सांगली शहर व परिसरालाच पसंती दिली आहे. उपकेंद्र इतरत्र झाल्यास प्रशासन पूर्णवेळ देऊ शकणार नाही. जिल्ह्यातील १३०पैकी ९०हून अधिक महाविद्यालये सांगलीजवळ आहेत, त्यामुळे उपकेंद्र महापालिका हद्दीतच हवे. शिवाय कवलापूर विमानतळाची जागाही सोयीची ठरेल. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनीही ताकद लावली पाहिजे.

- ॲड. अमित शिंदे, निमंत्रक, विद्यापीठ उपकेंद्र कृती समिती

उपकेंद्र समितीने बस्तवडे येथील जागा डोंगराळ असल्याने यापूर्वीच नाकारली आहे. खानापूरच्या जागेसाठीही जिल्हा प्रशासनाने फारसा प्रतिसाद दिलेला नाही. विद्यापीठाने व जिल्हा प्रशासनाने यातून तोडगा काढावा. सर्वांची सोय होईल, अशी जागा निवडून उपकेंद्राचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा. आपसातील संघर्षामुळे उपकेंद्र लांबणीवर पडेल, असे होऊ नये.

- उमेश देशमुख, सरचिटणीस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी

जिल्ह्यातील ६० टक्के महाविद्यालये आणि किमान चार तालुक्यांसाठी वाहतूक व इतर साधन-सुविधांच्यादृष्टीने कवलापूर येथील जागा सोयीची आहे. येथील सुमारे १६७ एकर जागा सध्या औद्योगिक महामंडळाच्या ताब्यात आहे. ती उपकेंद्रासाठी पुरेशी ठरेल. सांगली, कवलापूर परिसरातील शैक्षणिक संस्था तसेच नजिकच्या शहरांतील महाविद्यालयांसाठी ती जागा मध्यवर्ती आहे. त्यासाठी लढा उभा करायला हवा.

- अनिल डुबल, नवभारत मंडळ, बुधगाव

(समाप्त)