शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चापकटर खरेदीवरून जिल्हा परिषदेत वादंग

By admin | Updated: July 29, 2016 00:28 IST

सर्वसाधारण सभा : चौकशी समिती नियुक्त; साहित्य खरेदी व शिक्षक बदल्यांवरूनही खडाजंगी

सांगली : जादा दराने झालेली चापकटर खरेदी व त्यावरील वाद-प्रतिवादावरून जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. कृषी विभागाने खरेदी केलेल्या चापकटर खरेदी प्रकरणामुळे जिल्हा परिषदेचे नुकसान झाले आहे. या प्र्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, या मागणीवर सदस्य ठाम राहिल्याने अखेर चापकटर खरेदी प्रक्रियेच्या चौकशीसाठी समिती नेमून येत्या पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश जि. प. अध्यक्षा स्नेहल पाटील यांनी गुरूवारी दिले. दरम्यान, आंतरजिल्हा बदलीहून हजर झालेल्या २७ शिक्षकांना सोयीच्या नेमणुका द्याव्यात, या मागणीवर सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. अखेर विभागीय आयुक्तांना प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितला. जि. प. अध्यक्षा स्नेहल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभेस सुरूवात झाली. जिल्हा परिषदेच्या ५८.३६ कोटीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. या सर्वसाधारण सभेत कृषी विभागाची साहित्य खरेदी प्रकरण व शिक्षकांच्या रखडलेल्या नियुक्त्यांचा प्रश्न गाजणार, हे अपेक्षित होतेच. त्याप्रमाणे कृषी विभागाने केलेल्या चापकटर खरेदीत जादा दराने खरेदी झाल्याने जिल्हा परिषदेचे १७ लाख ८६ हजारांचे नुकसान झाले असून याची वसुली संबंधितांकडून वसुली करण्यात यावी, असा ठराव करण्याची मागणी रणधीर नाईक यांनी केली. या विषयावर सभेत जोरदार चर्चा झाली. याबाबत समाधानकारक उत्तर देताना कृषी अधिकारी भोसले यांची अक्षरश: दमछाक उडाली होती. नाईक यांच्याबरोबरच सुरेश मोहिते, छायाताई खरमाटे, मीनाक्षी महाडिक यांनीही या विषयावर मुद्दे मांडत साहित्य खरेदीप्रकरणी वसुली करण्याची मागणी लावून धरली. अखेर अध्यक्षा पाटील यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी करण्याचा निर्णय झाला. यावर, पाटील यांची समिती नको, असा पवित्रा सदस्यांनी घेतल्याने अखेर प्रकल्प संचालक अजयकुमार माने यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे चौकशी करून अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले. आंतरजिल्हा बदलीहून आलेले २७ शिक्षक जिल्हा परिषदेकडे हजर होऊन दोन महिने होत आले तरीही त्यांना सोयीच्या ठिकाणी नेमणूक दिली नसल्याबाबत सभेत जोरदार चर्चा झाली. दहा ते पंधरा वर्षे या शिक्षकांनी घरापासून दूर काम केल्याने त्यांची सोयीच्या ठिकाणी बदली करावी, अशी मागणी सदस्य सुरेश मोहिते, गजानन कोठावळे, प्रकाश देसाई आदींनी लावून धरली. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले यांनी यावर, या शिक्षकांना १४ जूनला बदलीचे आदेश जारी करण्यात आल्याने आता यात बदल करण्यासाठी विभागीय आयुक्तांना प्रस्ताव पाठविणे आवश्यक असून, सदस्यांची मागणी लक्षात घेता, दोन दिवसात प्रस्ताव सादर करू, असे सांगितले. सीईओंनी आयुक्तांकडे प्रस्ताव न पाठविता आदेशात अंशत: बदल करण्याची मागणी सदस्यांनी केली. मात्र, आयुक्तांकडेच प्रस्ताव पाठवून त्यात बदल करता येईल, असे भोसले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सभापतींनी जोडले हातचापकटर खरेदी प्रकरणावरून सभागृहातील वातावरण गरम झाले असतानाच कृषी सभापती संजीव सावंत यांनीही आपला संताप व्यक्त करीत कृषी अधिकाऱ्यांच्या कारभारावर हात जोडले. अधिकाऱ्यांकडून नाहक बदनामी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगताच, सदस्यांनी पदाधिकाऱ्यांचे अधिकारी ऐकत नसल्यास कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली. सोलर पंपाचे प्रस्ताव तीन महिने झाले तरी दिले नसल्याचे सभापतींनी सांगताच, अधिकारी तुमचे ऐकत नसल्यास कृषी सभापतींनी राजीनामा द्यावा असे म्हणताच, सभापती सावंत यांनीही राजीनामाची तयारी दर्शविली. जिल्हा परिषदेतर्फे विविध योजनेतून देण्यात येणाऱ्या साहित्याच्या दर्जाबाबत सभेत चर्चा झाली. याचे उदाहरण देताना सदस्या मीनाक्षी महाडिक यांनी सांगितले की, दिलेली शिलाई यंत्रे अजिबात चालत नाहीत, पिठाच्या गिरण्या दोन दळणे झाल्यानंतरच बंद पडत आहेत. सायकली तर सहा महिनेच कशातरी टिकतात. त्यामुळे जिल्हा परिषदेने दर्जेदार साहित्यांचीच खरेदी करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी साहित्य खरेदीबाबत अनुदान लाभार्थीला देण्यात यावे की साहित्यच देण्यात यावे, यावर सभेत वादळी चर्चा झाली.