शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत १०३ कोटींच्या निविदेवरून वादंग

By admin | Updated: January 10, 2017 23:06 IST

स्थायी समिती सभा : प्रशासन धारेवर; समितीस अंधारात ठेवल्याचा सदस्यांचा आरोप

सांगली : मिरजेतील १०३ कोटी रुपयांच्या अमृत योजनेच्या निविदाप्रकरणी मंगळवारी स्थायी समिती सभेत जोरदार वादंग झाले. स्थायी समितीला अंधारात ठेवून प्रशासनाने या निविदा प्रसिद्ध केल्याबद्दल सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती संगीता हारगे यांनी दिले. सभेत पाणी योजनेच्या निविदा परस्पर काढणे, कचरा उठाव आदी विषयांवर वादळी चर्चा झाली. अमृत योजनेची १०३ कोटींची निविदा प्रशासनाने परस्पर काढल्याप्रकरणी दिलीप पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. स्थायीच्या मंजुरीशिवाय प्रशासनाने परस्पर निविदा कशी काढली, असा सवाल केला. यावर प्रशासनाच्यावतीने उपायुक्त सुनील पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, ४० दिवसांत प्रक्रिया पूर्ण करुन शासनाला अहवाल देणे आवश्यक होते. नागरी हिताच्या दृष्टीने ही प्रक्रिया राबवावी लागली. अंतिम मंजुरीसाठी स्थायीकडे हा विषय येईल, असा खुलासा केला. यावर दिलीप पाटील यांनी स्थायी सभेत निविदा काढण्याची मंजुरी घेणे आवश्यक असताना, परस्पर निविदा काढण्याचा बेकायदेशीर प्रकार केला आहे. प्रशासन महापालिकेचे मालक झाले काय, असा सवाल केला. संतोष पाटील यांनी आपल्यातील राजकारणाचे भांडवल करुन ही योजना थांबवू नये. प्रशासनाने यासदंर्भात सविस्तर खुलासा सादर करावा, अशी मागणी केली. अधिकाऱ्यांनी काहीच उत्तर दिले नाही. शेवटी यावर सभापती संगीता हारगे यांनी दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका उपायुक्त यांना दिले. अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल देण्याचे आश्वासन दिले.प्रदीप पाटील, निर्मला जगदाळे यांनी शहरातील कचऱ्याचा प्रश्न उपस्थित केला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी विश्रामबाग येथील डे्रेनेजचे काम बंद पाडले. हे काम निकृष्ट होते का, प्रशासनाने आदेश दिले होते का, असे अनेक सवाल उपस्थित केले. यावर संतोष पाटील म्हणाले की, अशी नागरी हिताची कामे परस्पर बंद पाडली जात असतील, तर कारवाई काय केली, झालेले नुकसान कोण भरुन देणार, अशी विचारणा प्रशासनाकडे केली. नागरिकांची तक्रार असेल तर, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करणे आवश्यक होते, असेही मत व्यक्त केले. अधिकारी उपाध्ये यांनी हे काम सुरू केल्याचे सांगून यापुढे परस्पर जर एखाद्याने काम बंद पाडले तर, फौजदारी दाखल केली जाईल, असा इशारा दिला. (प्रतिनिधी)